प्रतिनिधी /वडूज/सातारा :
कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना माणसाने सामाजिक भान ठेवून काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी केले.
खटाव-माण सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी रा.स.प.चे राज्य संघटक भाऊसाहेब वाघ, युवा जिल्हाप्रमुख श्रीकांत देवकर, येरळवाडीचे माजी सरपंच सदाभाऊ बागल, संस्थेचे अध्यक्ष योगेश जाधव, उपाध्यक्ष प्रवीण बागल, कार्याध्यक्ष श्रीराम बागल, खजिनदार अक्षयराज जाधव, श्रीनाथ बागल, विशाल शिंदे, मयूर यादव, प्रशांत काशिद, रिहाल मुल्ला, नेहा पाटोळे यांची उपस्थिती होती.
पोलीस प्रमुख सातपुते पुढे म्हणाल्या, नोकरी, उद्योग, व्यवसाय या सर्वच क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. सर्वच ठिकाणी कठोर परिश्रमाला पर्याय नाही. कोणत्याही क्षेत्रात झोकून दिल्यास निश्चितपणे यश मिळते. पत्रकारीता क्षेत्रातील लोकांनी व्यवसायाबरोबरच कायम समाजाचे हित जोपासने गरजेचे आहे. समाजासाठी चांगले काम केले की त्याची निश्चितपणे दखल घेतली जाते. पुरस्कारामुळे लोकांना आणखी काम करण्याची प्रेरणा मिळते. सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब, भटक्या विमुक्त तसेच प्राणीमात्रांसंबंधी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी भाषणात कौतुकही केले.
यावेळी वडूज येथील पत्रकार धनंजय क्षीरसागर, शेखर जाधव, मायणी येथील संदीप कुंभार, महेश जाधव, मलवडी येथील रुपेश कदम, म्हसवड येथील महेश कांबळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. योगेश जाधव यांनी प्रास्तविक व स्वागत केले. प्रशांत जाधव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास पत्रकार बापुसाहेब मिसाळ, दत्ता कोळी, सतीश डोंगरे, स्वप्निल कांबळे, सागर पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते.::