प्रतिनिधी/ मडगाव
प्राण गेले तरी चालतील पण जो पर्यंत सरकार रेल्वे मार्ग दुपदरी करण करण्यापासून रोखत नाही तो पर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याचे संकेत गोंयचो एकवट संस्थेच्या रॉयला फर्नांडीस यांनी दिले.
मडगाव येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी पत्रकार परिषदेत क्रेसन आंताव व इतर उपस्थित होते.
‘गोंयचो एकवट’ व ‘गोंयात कोळसो नाका’ या संघटनेतर्फे रविवार दि. 1 नोव्हेंबर रोजी चांदोर येथील रेल्वे रुळावर बसून धरणे आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन सरकारने रेल्वे मार्ग दुपरीकरण करण्यापासून निर्णय मागे घ्यावा याकरीता करण्यात आले होते. पण सरकारने अहिंसा पद्धतीने आंदोलन करणाऱया अनेक आंदोलकांच्या विरोधात एफआयआर नोंद करण्यात आले. त्यामुळे गोंयचो एकवट या संस्थेतर्फे सरकारच्या या निर्णवर निषेध करण्यात आलेला आहे,
सरकारने आंदोलकांच्या विरोधात घेतलेला हा निर्णय अत्यंत चुकीचा असून कारण आम्ही कोणतीही मोडतोड केलेली नाही. ज्या लोकांनी मोठय़ा प्रमाणात झाडांची कत्तल केलेली आहे अशावर सरकार कोणतीच कारवाई करत नाही. उलट गोव्याच्या हितासाठी लढणाऱया लोकांवरच सरकार एफआयआर नोंद करत आहे. यातून सरकारला राज्याच्या हिताचे काहिच पडून गेले नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे जनतेने पुन्हा एकदा एकत्र यावे असे आवाहन फर्नांडीस यांनी यावेळी केले.
राज्यातील प्रजेने निवडून आणलेले हे सरकार असून त्यामुळे सरकारने आपल्याला हव्या त्या पद्धतीचे निर्णय घेऊ नये. जनतेला सदर प्रकल्प नको असून तेव्हा जनतेच्या निर्णयाबरोबर सरकारने राहण्याची गरज आहे. सरकार आपला निर्णय बदलत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करत राहतील असा इशारा जुझे काब्राल यांनी दिला.
सरकारने गोव्यातील जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करु नये. आज शनिवार दि. 7 रोजी सायं. 4 रोजी मडगाव लोहिया मैदानावर गोंयचो एकवट संस्थेतर्फे सभा घेतली जाणार आहे. या सभेत गोव्यातील जनतेने मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे असे आवहन क्रेसन आंताव यांनी यावेळी केले.