कोल्हापूर / प्रतिनिधी
स्वातंत्र्य चळवळ आणि सहकार चळवळ याचा एक मेकांशी संबध आहे. महात्मा गांधी यांनी चळवळीच्या काम बरोबर विधायक काम करा असे आदेश दिले होते. विधायक म्हणजेच सहकार होय. पण आताचे सरकारला याचा विसर पडला आहे. तो मोडीत काढला जात आहे. असा आरोप प्रा. आनंद मेणसे यांनी केला. अखिल भारतीय किसन संगर्षं समनव्य समितीच्या वतीने आयोजित सहकार वाचवा परिषदेत बोलत होते.
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतीचा मालक नोकर झाला आहे. आत्ताचे सत्ताधारी म्हणजे त्या वेळचे जनसंघ होय. चुकीच्या पद्धतीने शेतकरी कायदे करून समाज व्यवस्था मोडण्याचा घाट सत्ताधारी लोकांचा आहे.
सहकार शेती मोडून धनिकांच्या घश्यात घालण्याचा डाव सरकारचा आहे. कामगार शेती, सहकार चळवळ टिकवण्यासाठी तरुणांना पुढे आले पाहिजे. सहकार संकल्पना टिकवण्यासाठी तळापर्यंत काम पोहचले पाहिजे. नॅशनल बँका यासाठी योगदान देत नाहीत. केंद सरकार कार्पोरेट खरे आहे. असा भास करत आहेत, असा आरोप केला.
यावेळी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, संपत बापू पाटील, बाबुराव कदम, नामदेव गावडे, शुभांगी पाटील, वसंत पाटील, बाबासो नदाफ उपस्थित होते.कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्र विभागीय सहकार वाचवा परिषद शनिवार २८ रोजी मुस्लीम बोर्डिंग दसरा चौक येथे पार पडली. केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधी आहेत ते ताबडतोबीने मागे घ्यावेत असा ठराव विधीमंडळात करावा असा महत्वपूर्ण ठराव परिषदेत मांडण्यात आला.