नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाची दुसरी लाट जुलैमध्ये ओसरण्याची शक्मयता आहे. तसेच कोरोनाच्या दुसऱया लाटेचा सामना करणाऱया भारताला ऑक्टोबरनंतर तिसऱया लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तथापि, कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे प्रतिकारशक्ती वाढली असल्यामुळे अनेकजण तिसऱया लाटेपासून सुरक्षित असतील, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या तीन-सदस्यांच्या समितीकडून हे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. तिसऱया लाटेत कोणत्या राज्यात रुग्णसंख्या कमी होऊ शकते आणि कोणत्या राज्यांना फटका बसू शकतो याचाही अंदाज यावेळी समितीने वर्तवला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, हरियाणा, दिल्ली आणि गोवा या राज्यात आधीच कोरोनाबाधितांच्या संख्येने शिखर गाठले असल्याचे समितीचे सदस्य असणारे आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले आहे.