प्रतिनिधी / सांगली
अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नऊ महिन्यानंतर सांगली शहरातील सार्वजनिक वाचनालये सुरू झाली आहेत. वाचकांची संख्या टिकून आहे. दिवाळी अंका बरोबरच कथा-कादंबऱ्या प्रवास वर्णन गूढ कथा रहस्यकथा चरित्र-आत्मचरित्र आदि प्रकारातील साहित्याला चांगला वाचक असल्याचे सांगण्यात आले. वाचनालये सुरु झाले आहेत पण वाचकांची संख्या मात्र अजून कमीच आहे.
सांगलीत वाचनालयातून नियमितपणे पुस्तके नेणाऱ्यांचे प्रमाण तीस टक्के तर कथा-कादंबऱ्या वाचणार्यांचे प्रमाण 50 ते 60 टक्के असल्याची माहिती गांधी ग्रंथालयाचे ग्रंथपाल दिगंबर सूर्यवंशी यांनी दिली. सध्या वाचक संख्या कमी असली तरी नव्या वर्षात कोरोना चे संकट जसजसे कमी होईल तसे वाचकांची संख्या वाढेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.