22 जणांचे मृत्यूः मनपा क्षेत्रात 65 वाढलेः ग्रामीण भागात 485 रूग्ण वाढलेः 25 हजारापेक्षा अधिक रूग्णांची कोरोनावर मात
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात तब्बल 1011 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर त्यांच्या फक्त निम्म्याने म्हणजे 550 नवीन रूग्ण वाढले आहेत. ही जिल्हÎासाठी अत्यंत चांगली गोष्ट घडत आहे. जिल्हÎात आजअखेर 25 हजार 787 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. पण उपचार सुरू असताना 22 जणांचे मृत्यू झाले आहेत. एकूण जिल्हÎात 1309 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे.
महापालिका क्षेत्रात अवघे 65 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात नवीन अवघे 65 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 48 तर मिरज शहरात 17 रूग्ण वाढले आहेत. ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. किंवा जे कोरोना रूग्णांच्या संपर्कात आले आहेत. त्यांचीच तपासणी आता करण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रात आजअखेर एकूण रूग्णसंख्या 13 हजार 523 झाली आहे.
ग्रामीण भागात 485 रूग्ण वाढले
ग्रामीण भागात रूग्ण संख्या वाढत चालली आहे. नवे 485 रूग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात मोठÎा संख्येने रॅपीड ऍण्टीजन टेस्ट सुरू केल्याने ही रूग्णसंख्या वाढत आहे. तालुकानिहाय वाढलेली रूग्णसंख्या अशी, आटपाडी तालुक्यात 29, जत तालुक्यात 49, कडेगाव तालुक्यात 83 नवीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 36, खानापूर तालुक्यात 47, मिरज तालुक्यात 42 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 40, शिराळा तालुक्यात 40, तासगाव तालुक्यात 28 आणि वाळवा तालुक्यात 91 रूग्ण वाढले आहेत.
जिल्ह्यातील 22 जणांचा मृत्यू
जिल्ह्यातील 22 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील एकाचा तर मिरज शहरातील एकाचा मृत्यू झाला आहे. आटपाडी तालुक्यातील एकाचा, जत तालुक्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील एकाचा, खानापूर तालुक्यातील तीन जणांचा मिरज ग्रामीण भागातील तीन जणांचा मृत्यू झाला. पलूस तालुक्यातील एकाचा, तासगाव तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाला. शिराळा तालुक्यातील दोघांचा आणि वाळवा तालुक्यातील पाच जणांचे उपचार सुरू असताना मृत्यू झाले आहेत. जिल्हÎातील एकूण 22 जणांचा सोमवारी मृत्यू झाला आहे. आजअखेर 1309 जणांचे मृत्यू झाले आहेत.
परजिल्ह्यातील नवे तीन रूग्ण दाखल
परजिल्ह्यातील नवीन तीन रूग्ण जिल्हÎात उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यामध्ये कोल्हापूरचे दोन आणि सातारा जिल्हÎातील एक रूग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्हÎात आजअखेर परजिल्हÎातील 1153 जणांच्यावर उपचार करण्यात आला त्यातील 658 जण कोरोनामुक्त होवून गेले तर 319 जणांच्यावर आता उपचार सुरू आहेत. आजअखेर 176 जणांचा मृत्यू झाला आहे.
25 हजारापेक्षा अधिक रूग्णांची कोरोनावर मात
जिल्ह्यात सोमवारी 1011 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. नवीन रूग्णापेक्षा दुप्पट रूग्ण सलग दुसऱया दिवशी बरे झाले आहेत. सलग नवव्या दिवशी वाढलेल्या नवीन रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या अधिक असल्याने जिल्हÎाला फार मोठा दिलासा मिळत चालला आहे. जिल्हÎात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या ही 25 हजार 787 झाली आहे. जवळपास 74 टक्के रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्हÎात मोठÎाप्रमाणात रूग्ण वाढत असतानाच कोरोनामुक्त होणारे रूग्णही वाढत चालल्याने जिल्हÎाला हा मोठा दिलासा मिळत आहे. त्यामध्ये सलग नऊ दिवस वाढलेल्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या मोठÎाप्रमाणात आहे.
2460 जणांचे स्वॅब तपासले
जिल्हÎात सोमवारी दोन हजार 460 जणांचे स्वॅब तपासले आहेत. यामध्ये आरटीपीसी मधील 847 स्वॅब तपासणी केली तर रॅपीड ऍण्टीजन टेस्टमध्ये 1613 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये नवीन 550 रूग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाची जिल्ह्यातील स्थिती
एकूण रूग्ण 34850
बरे झालेले 25787
उपचारात 7754
मयत 1309