प्रतिनिधी / इस्लामपूर
उरुण-इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष व जेष्ठ नेते विजयराव गणपतराव पाटील तथा भाऊ (७२)यांचे शनिवारी दुपारी राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले.
ते लोकनेते राजारामबापू पाटील व त्यांच्या पश्चात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे विश्वासू सहकारी होत. त्यांच्या रुपाने गेल्या ३५ वर्षाहून अधिक काळाचा राजकारण व समाजकारणातील अनुभवी दुवा निखळला. शहर विकासात विजयभाऊ पाटील यांची भूमिका महत्वपूर्ण आहे. गेल्या काही वर्षांपासून ते कर्क रोगाशी सामना करीत होते. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा संदीप,एक मुलगी, पुतण्या, सुना-नातवंडे असा परिवार आहे.