सांगली / प्रतिनिधी
मराठीतील थोर साहित्यिक आणि सांगली जिल्ह्याचे थोर सुपुत्र ग. दि. माडगूळकर यांचे पुण्यासह माडगूळ आणि शेटफळे येथे उचित स्मारक व्हावे या हेतूने सांगली जिल्ह्यातील साहित्यिकांसह सांस्कृतिक, कला , अशा विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी जेष्ठ साहित्यिक वैजनाथ महाजन, जनस्वास्थ्य परिवाराचे डाॅ. अनिल मडके, पत्रकार शिवराज काटकर यानी ग. दि. माडगूळकर यांच्या आठवणीना उजाळा देत स्मारकांच्या कामाला गती द्यावी अशी मागणी केली. यावेळी आभाळमाया फौंडेशनचे प्रमोद चौगुले, राजपूत शैक्षणिक संकुलाचे कुटुंब प्रमुख प्रा. एम. एस. राजपूत, जेष्ठ साहित्यिक नामदेव माळी संजय पाटील , डाॅ. स्वाती शिंदे-पवार, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बिरजे, तानाजी बोराडे, जेष्ठ साहित्यिक नीलम माणगावे, प्रा. उज्वला केळकर, प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, चंद्रकांत देशमुखे, हरमन चहाचे संचालक हरिभाऊ कुलकर्णी, नाटककार राजेंद्र पोळ, नंदू गुरव आदि मान्यवर उपस्थित होते.
मराठीतील ख्यातनाम गझलकार प्रदिर्घ निफाडकर यांच्या पुढाकारातून राज्यात सर्वत्र गदिमा स्मारकासाठी कवितांचा जागर करत जनआंदोलन केले. या जनआंदोलनास जिल्ह्यातून अतिशय उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रा. भीमराव धुळूबुळू यानी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविकात या अभिनव कविता जागर जनआंदोलनाबद्दलची माहिती दिली. महेश कराडकर यानी आभार मानले.
सांगलीतील अर्चना मुळे यांच्या संवाद ग्रुपच्या संवादिनी डाॅ. दिपाली वाळवेकर; जोती पाटील, डाॅ. प्रांजली माळी, अस्मिता इनामदार , सारिका मुळ्ये या महिला सख्यांच्या गदिमांच्या काव्य वाचनाने या कविता जागर जनआंदोलना ची सुरुवात झाली. प्रा. धनदत्त बोरगावे, बाबा परिट, प्रा. संतोष काळे, सुहास पंडीत, प्रा. अनिलकुमार पाटील, प्रा. निर्मला लोंढे , महेश कोष्टी, निलांबरी शिर्के, संपत कदम, बजरंग आंबी, प्रतिभा जगदाळे, सुनिता बोर्डे, प्रा. संजय ठिगळे, सदानंद माळी, अश्विनी कुलकर्णी,, प्रा. विश्वनाथ गायकवाड, शाहीर चंद्रकांत गायकवाड; रघुराज मेटकरी , मुबारक उमराणी,भीमराव कांबळे, नितिन माळी, विनायक कदम, दत्तात्रय सपकाळ, नाना हलवाई, भावगिते, रणजित मगदूम वृत्तपत्र संघटनेचे मारुती नवलाई, प्रकाश कुलकर्णी, श्रीशेल्य चौगुले, योगेश मेटकरी यांच्यासह जिल्ह्यातील उपस्थित मान्यवरांनी गदिमांच्या कविता, बालगीते, चित्रपट गीते , लावणी आदि काव्यप्रकार सादर केले.
शांतिनिकेतन येथे जिल्ह्यातील लेखक, कवी, यांच्यासह विविध विषयांवर लेखन केलेल्या ग्रंथ॔च्या एकेक प्रत संकलित करुन एकत्रीत करुन यशवंतराव चव्हाण ग्रथालायात स्वंतत्र दालन उभारण्यात येणार आहे या उपक्रमाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नामदेव भोसले, अभिजीत पाटील, दयासागर बन्ने, गौतम कांबळे, वर्षा चौगुले आदिनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.