२२७ कोरोनामुक्त : सांगलीत १११ तर वाळवा तालुक्यात ६१वाढले
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी कोरोनाने चार जणांचा बळी गेला आहे. तर शनिवारी नवीन ४११ रूग्ण वाढले आहेत. सांगली शहरात १११ तर मिरज शहरात ४७ रूग्ण वाढले आहेत. सध्या उपचारात तीन हजार ५६५ रूग्ण आहेत.
मनपाक्षेत्रात १५८ रूग्ण वाढले
शनिवारी सांगली शहरात तब्बल १११ तर मिरज शहरात ४७ रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर १८ हजार ६५१ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.
चार जणांचा मृत्यू
जिल्ह्यात शनिवारी सलग पाचव्या दिवशी चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वाळवा, मिरज ग्रामीण, तासगाव आणि कडेगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
नवे रूग्ण ४११
उपचारात ३५६५
बरे झालेले ४९६६१
एकूण ५५०६७
मृत्यू १८४१
शनिवारचे बाधित रूग्ण तालुका रूग्ण आटपाडी 16 कडेगाव 18 खानापूर 34 पलूस 25 तासगाव 20 जत 27 कवठेमहांकाळ 12 मिरज 28 शिराळा 12 वाळवा 61 सांगली शहर 111 मिरज शहर 47 एकूण 411 |