प्रतिनिधी / सांगली
कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लॉकडाऊन सुरूच राहणार असून १९ मे पासून पुढील सात दिवस फळे, भाजीपाला, किराणा, बेकरी घरपोच सेवा सुरू राहणार आहे. त्याचबरोबर दि. १९ ते २६ या काळात दुकाने उघडी ठेवता येणार नाहीत.
१९ ते २२ मे दरम्यान मार्केट यार्ड सकाळी सात ते अकरा किरकोळ दुकानदार खरेदीसाठी सुरू राहणार. शेती विषयक कामे आणि दुकाने सकाळी सात ते अकरा सुरू राहतील अशी माहिती, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.