विठ्ठलापूर-दत्तवाडी पुलही नव्या भारण्याचा विचार.मुख्यमंत्रीडॉ.प्रमोदसावंत यांची माहिती.विठ्ठलापूर ते भंडारवाडा पुलाचे उदघाटन.
डिचोली/प्रतिनिधी
साखळी शहराचा विकास झपाटय़ाने होत असतानाच या शहराला विविध माध्यमातून जोडण्यासाठी अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत. विठ्ठलापूर ते भंडारवाडा साखळी या पुलामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार असून दोन्ही बाजूच्या लोकांना त्याचा लाभ होणार आहे. तसेच गेली 60 वर्षे वाहतुकीचा भार सांभाळणारा विठ्ठलापूर – दत्तवाडी हा पुलही नव्याने साकारण्याचा सरकारचा विचार असून त्यादृष्टीने आराखडा तयार.करण्यात येणार आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.
विठ्ठलापूर ते भंडारवाडा साखळी बाजार या नवीन पुलाच्या उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. लाकडी, त्यानंतर लोखंडी बनून लोकांना अविरत सेवा दिलेल्या या पुलावरून लहान तरी वाहने जावी अशीच सर्वांची अपेक्षा आणि स्वप्नही होते ते आज पूर्ण झाले आहे. या पुलाबरोबरच साखळी बाजार ते म्हावळंगतड या भागाला जोडणारा अत्यंत महत्वाकांक्षी साकव लवकरच साकारण्यात येणार असून त्याचा या पुलाशी जोडणीचा चांगला फायदा होणार आहे. त्याबरोबर कारापूर ते विर्डी या विर्डी आमोणा पुलानंतरचा दुसरा टप्पाही साकार करण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. असेही यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यां?नी सांगितले.
या पुलाला शहिद वीर जयेंद्र झोयबा राणे सरदेसाई यांचे नाव देण्यात आले आहे. यावेळी मयेचे आमदार प्रवीण झांटय़?, अपर्णादेवी राणे, नगरसेवक आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, रश्मी देसाई, शुभदा सावईकर, जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत, कारापूर सर्वणचे सरपंच गोकुळदास सावंत, गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाचे संचालक दत्तराम चिमुलकर, दयानंद कारबोटकर, युवा अध्यक्ष सिताराम सावंत, रियाझ खान व इतरांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली साखळी बरोबरण मये मतदारसंघाचाही विआस मोठय़ा प्रमाणात चालू आहे. या पुलाचा विठ्ठलापूर कारापूर भागातीलही लोकांना चांगलाच फायदा होणार आहे. तसेच कारापूर विर्डी या दुसऱया एका पुलाच्या कामाला लवकरच चालना मिळावी, असे मयेचे आमदार प्रवीण झांटय़? यांनी म्हटले.
माजी नगराध्यक्ष विजयकुमार वेरेकर यांनी लाकडी पुलाचा इतिहास कथन केला. यावेळी अपर्णादेवी राणे यांचा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अपर्णादेवी राणे यांनी पुलाच्या जोडरस्त्यासाठी जागा दान केली आहे. तसेच भंडारवाडा येथेही या कामाला सहकार्य केलेल्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कोनशीला अनावरण करून आणि फित कापून पुलाचे उदघाटन करण्यात आले.
पुलाच्या उदघाटनास लोकांची संख्या मोठी
प्रथमदर्शनी या पुलाच्या उदघाटनासाठी जास्त प्रमाणात लोकांना आमंत्रित न करण्याचा बेत होता. मात्र उदघाटनाची वार्ता समजल्यावर पुलाच्या ठिकाणी राजकीय आणि अराजकीय लोकांची गर्दी जमली. सर्वांनी मात्र मास्क परिधान केले होते. स्वतः मुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि सुरक्षारक्षकही लोकांना सामाजिक सुरक्षा अंतर राखण्यासाठी पुन्हा पुन्हा आवाहन करीत होते. तरीही या पुलाच्या उदघाटनासाठी आतुरलेल्या लोकांकडून सामाजिक सुरक्षा अंतराणा फज्जाच उडताना दिसून आला.