अक्कलकोट / प्रतिनिधी
सातनदुधनीत मध्यरात्री ठिक १.१५ वाजता चोरांचा ताफा गावात शिरल्याचे कळताच गावातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या १८००२७०३६०० या क्रमांकाच्या टोल फ्री सेवेद्वारे व सायरनद्वारे टीमसह ग्रामस्थांना सुचना देऊन आख्या गावाला जागा करून एकत्र आल्याने चोरांना गावाबाहेर हाकलून लावण्यात ग्रामस्थांना यश आले.
या सतर्कतेमुळे गावातील चोरीचा अनर्थ घटना घडली नाही. शासनाच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या अक्कलकोट पोलीस खाते व सातनदुधनीच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसुरक्षा यंत्रणेचा सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या ऊस तोडणी, सुगीचे दिवसाबरोबरच कडक थंडीचे वातावरण असल्यामुळे याचा पुरेपुर फायदा घेण्याचा चोरांचा डाव फसला. याकामी अक्कलकोट दक्षिणचे हेडकॉन्स्टेबल सुनिल माने यांनी मध्यरात्री तात्काळ गावात हजर राहून सर्व यंत्रणा हलविले.
यावेळी सरपंच विठ्ठलराव खताळ, पोलीस पाटील महादेवराव पाटील, ग्रामसुरक्षा यंत्रणेचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.