बस फेऱयांची संख्या कमी केल्याने बसेसमध्ये होवू लागली गर्दी
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. राज्यातल्या मेट्रोल सिटीत कोरोनाचा स्फोट सुरु आहे. असे असताना राज्य शासनाने निर्बध घातले गेले आहेत. त्या निर्बंधाचा परिणाम म्हणजे कमी केलेल्या बसेसमध्ये मोठय़ा प्रमाणात प्रवाशांची संख्या होवू लागली आहे. तुंडूंब गर्दीने बसेस जात आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका टळण्याऐवजी वाढण्याची शक्यता आहे. तर प्रशासनाच्यावतीने आगारप्रमुख रेश्मा गाडेकर या म्हणतात की प्रवाशांची आम्ही सर्व काळजी घेतो, असे त्यांनी सांगितले.
सातारा आणि पुणे असा दररोज प्रवास करणाऱयांची संख्या मोठी आहे. साताऱयातून स्वारगेटवर विनावाहक विना थांबा सेवा आहे. त्या सेवेला सर्वात जास्त प्रतिसाद मिळतो. पुण्यात नोकरी करणारे साताऱयातले अनेकजण आहेत. लॉकडाऊनच्या काळात हे सर्व र्वक फॉर्म होम करत होते. परंतु पुन्हा ऍन लॉक झाल्याने एसटीने प्रवास करु लागले. परंतु पुन्हा कोरोनाचा वाढता आकडा पाहून त्यांना आपल्या कामावर जाणे टाळता येत नाही. आताही दररोज पुण्याला जाणारे आणि पुण्यावरुन साताऱयाला येणाऱयांची संख्या मोठी आहे. ही संख्या पहाता सातारकरांना पुणेकरांची धास्ती बनू लागली आहे. संपूर्ण सातारा शहर हे हॉटस्पॉट ठरले आहे. शहरात तब्बल 43हून अधिक ठिकाणे कंटेटमेटं झोन आहेत. असे असताना पुण्यातून येणारे व पुण्याला जाणारे एसटीतील प्रवाशी हे आजही बिनधास्पतणे प्रवास करतात. त्यात मुळच्या बसेसची संख्या कमी केली आहे. त्यामुळे पुण्याला जाणाऱयांची संख्या कमी झालेली नाही. ते खाजगी व एसटीनेच भले उभे राहूनच जातात. त्याचा परिणाम म्हणजे कोरोना वाढण्यासाठी हा प्रवास धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
आम्ही सर्व काळजी घेतो
पुण्याला आणि मुंबईला जाणाऱया प्रवाशांची आम्ही एसटी प्रवाशांच्याकडून सर्वं काळजी घेतो. प्रवाशांना हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करण्यास सांगतो. प्रत्येक प्रवाशांस मास्क वापरण्याची विनंती करण्यात येते. प्रत्येक प्रवाशांचे टेम्परेच पाहूनच त्यांना तिकीट दिले जाते. सोशल डिस्टन्सनेच गाडीत प्रवाशी बसवले जातात.