प्रतिनिधी /सातारा
सातारा जिल्हा परिषदेमध्ये विविध विभागामध्ये जिल्हय़ातुन नागरिकांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ सुरू असते. कोविड-19 च्या अनुषंगाने सातारा जिल्हा परिषदेमध्ये विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली होती व आजही सदर योजनांचे पालन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून आता लसवंत नागरिकांनाच जिल्हा परिषदेत प्रवेश देण्यात येणार आहे.
सद्यपरिस्थितीत कोविड-19 जिल्हा प्रशासनाच्या अविरत प्रयत्नांनी आटोक्यात आला असला तरी भविष्यात त्याचा प्रादुर्भाव जास्त वाढू नदेण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱयांनी दि. 29 ऑक्टांबर पासुन कोविड लसीकरणाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सुचना प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांनाच जिल्हा परिषदेत प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौण जी सी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी दिली आहे.