सातारा/ प्रतिनिधी
टोल नाका बंद करा या मागणीसाठी रिपाईने आज साताऱ्यात आंदोलन केले. त्यांनी सातारा जिल्ह्यातील अनेवाडी आणि तासवडे या दोन टोल नाक्यावर जिल्ह्यातील वाहनांना टोल द्यावा लागत असल्याने हे टोल नाके बंद करावे या मागणीसाठी रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनात बंद करा बंदतोल नाके बंद करा, अशा घोषणा देत जोरदार निदर्शने केली. यावेळी जिल्ह्यातून कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच आंदोलनाच्या ठिकाणी पोलीस पथक तीनात करण्यात आले होते.