सातारा / प्रतिनिधी :
अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधव होरपळून गेला असताना पशुसंवर्धन विभाग त्यांच्या मदतीला धावून आला आहे. जिल्हा परिषद सातारा अंतर्गत जिल्हा परिषद 2019-20 च्या माध्यमातून सातारा तालुक्यातील एकूण 63 लाभार्थींना 23+2 तलंगा गटाचे वाटप मा. प्रतिक कदम जि प सदस्य ( लिंब गट), सरिता इंदलकर विद्यमान सभापती सातारा पंचायत समिती, डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, डॉ. संजय शिंदे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, डॉ. सुयोग वाघ पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती सातारा यांच्या उपस्थितीत पार पडला.
या तलंगा मोठ्या झाल्यानंतर अंडी उत्पादन सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना उत्पन्नाचा मोठा आर्थिक स्त्रोत उपलब्ध होणार आहे. तसेच कोरोनामुळे लोक मोठ्या प्रमाणावर प्रथिनेयुक्त आहाराकडे वळले आहेत. त्यामुळे देशी कोंबडीच्या अंड्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तसेच दरदेखील चांगला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नामध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती माननीय आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. तसेच पशुपालकांनी शेतीबरोबरच पूरक व्यवसाय म्हणून परसातील कुक्कुटपालनकडे वळण्याचे आवाहन मा. प्रतीक कदम जिल्हा परिषद सदस्य यांनी केले.