प्रतिनिधी/सातारा
महावितरण कंपनीच्या कारभाराचे एकेक नमुने पहायला मिळत आहेत.सातारा शहरात येणाया वळीवाच्या पावसाने कुचकामी ठरलेल्या विद्युत पोलवर ठिणग्या उडत आहेत.महावितरण कंपनीने काळजी घ्यावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना व रिपाईच्यावतीने देण्यात आला.
शिवसेनेचे रमेश बोराटे, आतिष ननावरे, बाळासाहेब शिंदे, रिपाइंचे प्रतीक गायकवाड, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब चव्हाण यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, जिह्यात प्रत्येक ग्राहकाला वाढीव विजबिल पाठवले आहे.लॉक डाऊन मध्ये घराला टाळा लावून इतर ठिकाणी रहातात.त्याना दोन्ही घराचा सरासरी भरणा करावा लागला आहे.लॉक डाऊन मध्ये महसूल कमी आल्याने अशा प्रकारे तूट भरून काढण्यासाठी विजेचा वापर न करता वीज वितरण कंपनी ग्राहकांची लूट करत आहे.हे थांबवून सुरक्षितता देण्यात यावी, काल वादळी पावसात पोवई नाका परिसरात शॉर्ट सर्किट झाले.असे प्रकार होऊ नये याची काळजी घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.