प्रतिनिधी / बेळगाव
सर्वसामान्य जनतेला वेळेत सातबारा उतारे मिळावेत, याकरिता शहरासह ग्रामीण नेम्मदी केंदे सुरू करण्यात आली आहेत. मात्र बहुतांशी नेम्मदी केंदे बंद असल्याने जुन्या तहसीलदार कार्यालयात असलेल्या नेम्मदी केंद्रात गर्दी वाढत आहे. उतारे काढण्यासाठी नागरिकांची रांग लागत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून हीच परिस्थिती असल्याने नागरिकांतून नाराजीचा सूर निघत आहे.
शेतकऱयांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सातबारा उतारा बंधनकारक आहे. पीक कर्ज, कृषी अनुदाने, बी-बियाणे यासह इतर कामासाठी सातबारा उतारा आवश्यक आहे. मात्र तो वेळेत मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. काही नेम्मदी केंदांना सर्व्हर डाऊनचे ग्रहण लागल्याने तहसीलदार कार्यालयातील नेमदी केंद्रांवर ताण वाढला आहे. परिणामी उतारा मिळविण्यासाठी नागरिकांना दिवसभर ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे इतरत्र ठिकाणी असलेली नेमदी केंदे सुरळीत सुरू ठेवावीत, अशी मागणी होत
आहे.
शासनाने नागरिकांच्या सोयीखातर तहसीलदार कार्यालयासह सांबरा, काकती, उचगाव, एपीएमसी मार्केट आदी ठिकाणी नेमदी केंदे सुरू केली आहेत. मात्र ही केंदे सर्रास बंदच असतात. विद्युत पुरवठा खंडित, तांत्रिक अडचणी ंिकंवा सर्व्हर डाऊनमुळे बंद ठेवली जातात. त्यामुळे नागरिक तहसीलदार कार्यालयाकडे धाव घेत आहेत. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढत आहे.