गेल्यावषी पेपरमधील एका बातमीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते, ती बातमी म्हणजे, ‘साडेपाच हजार पुणेकरांची ऑनलाईन फसवणूक, हॅकर्सनी घातला कोटय़वधींना गंडा’. बँकेतून किंवा एलआयसीतून किंवा एखाद्या लॉटरीच्या कंपनीतून बोलत आहे. आपल्याला लॉटरी लागली आहे. आपल्या विम्याचे पैसे मिळवून देतो अशी असंख्य कारणे सांगून लुटारुंनी तब्बल साडे पास हजार लोकांना गंडा घातला. अर्थात सायबर पोलिसांनी यातील काही आरोपींना अटक करण्यात यश मिळविले.
आजच्या टेक्नो सॅव्ही जमान्यात गुन्हेगारही मागे राहिलेले नाहीत. त्यांनीही टेक्नॉलॉजीचा फायदा करून आपली पोळी भाजायला सुरुवात केली आहे. टेक्नॉलॉजीचा गुह्यांसाठी फायदा करून घेत त्यामध्ये बरीच मजल मारली आहे. ‘सोय तितकी गैरसोय’ म्हणतात ते काही उगाच नाही. अनेक सुशिक्षित लोकही सायबर क्राईमचे बळी ठरत आहेत. असंख्य लोक हॅकर्सने दाखविलेल्या आमिषाला भुलून आपल्या बँक खात्याची व वैयक्तिक माहितीही देतात आणि लाखो रु. गमावतात. फसवणूक करणारे अनेक प्रकारच्या क्लृप्त्या लढवत असतात. मग कशी होते ही फसवणूक?
बँकिंग फ्रॉड
या प्रकारात प्रामुख्याने ज्ये÷ नागरिकांना लक्ष्य करण्यात येते. कॉल करणारे पीडित व्यक्तीच्या बँकेतून बोलत असल्याचे सांगून, बँक खात्यासंबंधित काही समस्या निर्माण झाल्याचे सांगून, ती सोडविण्यासाठी काही वैयक्तिक माहिती मागतात. यामध्ये पीडिताची वैयक्तिक माहिती, बँक खाते क्रमांक, पिन आणि इतर माहिती घेतली जाते व नंतर त्यांचे बँक अकाउंट हॅक केले जाते किंवा पैसे ट्रान्सफर केले जातात. अनेकदा एलआयसीच्या ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगितले जाते. ‘तुमची पॉलिसी मॅच्युअर झाली असून त्याची रक्कम (ही रक्कम अनेकदा लाखांच्या घरात असते) थेट बँक खात्यात जमा होईल’ असे सांगून, बँक खात्याबद्दल तसेच वैयक्तिक माहितीही मिळविली जाते.
अनेकदा नवीन पेडिट किंवा डेबिट कार्ड्स जारी करण्यात येणार आहे असे सांगून, त्यासाठी डेबिट/पेडिट कार्डची सर्व माहिती व सीव्हीव्ही क्रमांक मागितला जातो. त्यानंतर बोलण्यात गुंतवून ओटीपीही मागितला जातो. एकदा का व्यक्तीने ओटीपी दिला की मग काही सेकंदात त्याच्या बँक खात्यातील पैसे गायब होतात. त्यानंतर तो फोन नंबर कायमसाठी बंद झालेला असतो. वरील प्रकरणांमध्ये ओटीपी शेअर केला असेल, तर त्या प्रकरणात फसवणुकीची रक्कम बँकेकडून रिफंड केली जात नाही. पैसे विविध मर्चंट वॉलेटमध्ये गेलेले असल्यास सायबर सेलकडून संबंधितांना तातडीने मेलद्वारे पत्रव्यवहार करून अर्जदारांना रक्कम परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. महत्त्वाचे-बँक अथवा इन्सुरन्स कंपनी कधीही कोणत्याही व्यक्तीला फोन करून कधीही सीव्हीव्ही क्रमांक व ओटीपी विचारत नाही.
नोकरीचे अमिष
नोकरीसाठी नामवंत कंपन्यांच्या वेबसाईटसारखी फेक वेबसाईट (खऱयासारखी दिसणारी खोटी वेबसाईट) बनवून त्याद्वारे नोकरीचे आमिष दाखवणारे इ-मेल्स पाठवून तरुण-तरुणींची मोठय़ा प्रमाणावर फसवणूक केली जाते. एखाद्या कंपनीच्या लेटर हेडची कॉपी करून त्यावर खोटे ‘ऑफर लेटर’ बनवून घेऊन ते मेल करण्यात येते. एकदा का व्यक्तीने संबंधित ई-मेलला उत्तर दिले की मग हजारो रु. भरायला सांगून फसवणूक करण्यात येते. खरेतर कुठलीही कंपनी इंटरव्हय़ू शिवाय नोकरी किंवा टेनिंग देत नाही. तसेच ऑफर लेटरही मेल करत नाही किंवा कोणतीही पैशाची मागणी करत नाही तरी पण नोकरीची चिंता, ताण यामधून आपण पैसे भरतो व फसविले जातो. तेव्हा अशा प्रकारच्या इ-मेल्सना उत्तरे देणे नेहमी टाळा.
इ-मेलद्वारे फसवणूक
इ-मेलद्वारे फसवणूक ही तर आता नित्याची बाब झाली आहे. इ-मेलवर रोज शेकडोच्या संख्येने ‘स्पॅम’च्या नावाखाली फसविणारे मेल येतात. या मेलला उत्तर दिल्यानंतर फोन येणे, किंवा मेलद्वारे चॅटिंग करून फसवणूक केली जाते. अमुक एक रक्कम/पेडिट कार्ड/परदेशी ट्रिप यासाठी तुमचा ई-मेल आयडी निवडण्यात आला आहे, अशा प्रकारच्या ई-मेल्सना ‘स्पॅम’मध्ये टाकून द्या. कारण उत्तर दिल्यास तुम्ही त्यांच्या जाळय़ात अगदी सहज अडकत जाता. कुठलीही कंपनी/बँक/फायनान्शिअल संस्था विनाकारण कोणाला काहीही बक्षीस देत नाही. शक्मयतो अशी इमेल्स स्पॅममध्ये आपोआपच टाकली जातात. परंतु शेवटी ती एक यंत्रणा आहे, त्यामुळे साहजिकच त्याला मर्यादा असतात. आपण मात्र सावध राहणे आवश्यक आहे. उगाच लोभात अडकून अशा मेल्सना उत्तरे देण्याचे टाळावे.
ऑनलाईन सावकारी
लॉकडाऊनच्या काळामध्ये बऱयाच लोकांच्या नोकऱया गेल्या, हातावर पोट असलेले गरीब मजूर यांच्या जगण्याचे प्रॉब्लेम होऊ लागले. यातून जगायला पैसे पाहिजे म्हणून कर्ज काढले जाऊ लागले. हे कर्ज एखाद्या मोबाइल ऍपद्वारे सहज उपलब्ध होऊ लागले. इथेच फसवणुकीला वाव मिळू लागला. इंटरनेटद्वारे मोबाइलवर कर्ज देणाऱया कंपन्या शोधल्या गेल्यावर अशा प्रकारच्या अनेक जाहिराती मोबाईलवर फ्लॅश आपसूक होतात. त्यात सध्या ‘एका क्लिकवर ऑनलाइन कर्ज’ अशा जाहिराती सातत्याने दिसतात. या जाहिरातीला क्लिक केले की ते संबंधित ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. तात्काळ कर्ज मिळवण्याच्या इच्छेने हे ऍप डाऊनलोड केले जाते. संबंधित ऍप त्या व्यक्तीचा पॅन कार्ड क्रमांक, नोकरीचे ठिकाण, मासिक वेतन व बँक खात्याची माहिती विचारते. अमूक कर्ज रकमेचा हफ्ता असा असेल, असे भासवले जाते.
सर्व माहिती टाकताच ही रक्कम खात्यात जमादेखील होते. आपण हफ्ते भरण्यास सुरुवात करतो. पण 2-3 मासिक हप्ते भरले की लक्षात येते या कर्जावरील व्याजदर भीषण स्वरुपात वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे कर्ज रक्कम काही केल्या कमी होत नाही. जर आपण ती भरण्यास नाकारली तर आपल्या ऍडेस बुकमधील आपल्या परिचयांना कंपनीकडून फोन करून तुम्ही कर्ज बुडवले अशी माहिती देऊन आपली बदनामी करण्यात येते. यातूनच मग तणावाची स्थिती निर्माण होते. यामुळे अशा ऍपवर कर्ज घेण्यापासून मोबाइलकर्त्यांनी स्वतःला आवरण्याची गरज आहे. आपली आर्थिक बाजू कमकुवत असेल, चणचण भासत असेल तर अशा प्रकारे कर्ज घेण्याच्या भानगडीत न पडता रीतसर बँकेकडे मागणी करावी. मोबाईलद्वारे (ऑन-लाईन) कोणतेही आर्थिक व्यवहार करताना काळजी घेऊन आपली फसवणूक टाळावी. जर अशी फसवूक झाली तर नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करावी. तसेच बँक किंवा संबंधित इ-वॅलेटच्या कस्टमर केअरशी संपर्क साधावा.
विनायक राजाध्यक्ष