बँक खाते रिकामे होऊ शकते, जिह्यात एक ही सायबर सेल कडे तक्रार नाही, याविषयी जागृती करूः माध्यमिक शिक्षणाधिकारी
विशाल कदम / सातारा
सध्या कोरोनामुळे शाळा बंद शिक्षण सुरू हा उपक्रम सुरू आहे. पालकांचे मोबाईल मुलांच्या हातात अन् पालक वेगळ्याच कामात व्यस्त असतात. मुलं मोबाईलवर शिकते आहे, त्याचा वर्ग सुरू आहे असे पालकांना वाटते. परंतु हॅकर्सकडून मोबाईलवर फोन किंवा मेसेज येऊन ओटीपी मागवून पालकांचे बँक खाते रिकामे होण्याची भीती काही पालकांनी व्यक्त केली आहे. तशी अद्याप जिल्हा सायबर शाखेकडे तक्रार आले नसल्याचे समजते. शिक्षण विभागाच्या माध्यमातून या मुद्यावर पालकांना जागृतीपर आवाहन करणार आहे, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
कोरोनामुळे सगळ्यांचे वांदे केलेले आहेत.जून महिन्यात शाळा सूरु होतात.त्या अजून सुरू नाहीत.मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्य शासनानेच ऑन लाईन शिक्षणाचा फंडा सुरू केला आहे.खाजगी शाळांनी तर याची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. सरकारी शाळेमध्येही उपक्रमशील शिक्षकांनी हा उपक्रम सुरू केला. ज्या पालकांकडे मोबाईल आहेत, त्यांच्या मुलांचे शिक्षण मोबाईलवर सुरू केले. त्यामुळे पालकांचे मोबाईल मुलांच्याकडे असतात. नेट सुरू करून मुलांच्या हातात मोबाईल पालक देतात. पालक मग आपला मुलगा शिकतोय असे समजतात.हल्लीची चार पाच वर्षांची मुलं ही मोबाईल वापरण्यात खूप हुशार असतात.सातारा जिह्यात ब्रयापैकी ऑन लाईन शिकवणी सुरू आहे.पण याच संधीचा फायदा काही हॅकर्स घेऊ शकतात, अशी भीती काही पालकांना वाटू लागली आहे. कारण पालकांचे मोबाईलमध्ये त्यांचे बँक खाते मोबाईल नंबरला जोडलेली असतात. हकर्सकडून फोन करून किंवा ऑन लाईन चॅटिंग करून ओटीपी मागवला आणि तो वापरकर्त्यां मुलाने पाठवला तर काही वेळात बँक खाते रिकामे होऊ शकते.अशी भीती व्यक्त होत आहे.याबाबत जिल्हा सायबर शाखेकडे विचारणा केली असता तशी अजून एकही तक्रार आली नसल्याचे सांगण्यात आले. तर माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांना विचारले असता त्यांनी आपण पालकांना जागृती करू की तसा कोणी फोन करून ओटीपी मागितल्यास पाठवू नये, व केवळ ज्या तासिका घेतल्या जातात. त्याकडेच विध्यार्थीनी लक्ष द्यावे, असे सांगितले.