दिघंची / वार्ताहर
मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी दलित महासंघाच्यावतीने माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाला पाहिजे. अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे आटपाडी तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता दलित महासंघाच्यावतीने निवेदन देण्यात आले.
आटपाडी तालुका दलित महासंघाचे अध्यक्ष बळीराम रणदिवे त्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे भारतरत्न मिळाला पाहिजे, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच मातंग समाजाला अ, ब,क,ड वर्गीकरणानुसार आरक्षण मिळावे. महाराष्ट्राच्या विधानसभेवर मातंग समाजाला प्रतिनिधित्व देण्यात यावे.क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या आयोगाच्या शासनाने स्वीकारलेल्या शिफारशीची अंमलबजावणी व्हावी. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळ सक्षमपणे सुरु करावे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारक मुंबई येथे व्हावे व क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे पुणे येथे राष्ट्रीय स्मारक व्हावे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने अभ्यासकेंद्र सुरू करावेत. व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे लोककला अकादमीची स्थापन करावी. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला जयंतीसाठी करण्यासाठी 50 लाखांचा निधी वितरित करण्यात यावा. हा विविध मागण्या दलित महासंघाच्यावतीने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.