आरोग्यवर्धिनी योजनेंतर्गत नियुक्त्या : आमदार वैभव नाईक यांची माहिती
प्रतिनिधी / कणकवली:
जिल्हय़ातील 91 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांत बीएएमएस डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हय़ातील 248 उपकेंद्रांपैकी 91 उपकेंद्रांत या कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून जसजसे आणखी डॉक्टर उपलब्ध होतील, त्याप्रमाणे उर्वरित उपकेंद्रामंध्येही डॉक्टरांना नियुक्ती देण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना प्राथमिक आरोग्य पेंद्रांऐवजी उपकेंद्रांमध्येही उपचार सुविधा मिळणार आहेत. आरोग्यवर्धिनी योजनेंतर्गत या नियुक्त्या देण्यात आल्याचे यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत व तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून आरोग्यवर्धिनी योजनेंतर्गत उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी नियुक्तीची योजना आणली होती. यासाठी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री पातळीवर केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. आमदार नाईक यांच्या प्रयत्नातून 91 पैकी कुडाळ तालुक्मयात 11, तर मालवण तालुक्मयात 9 आरोग्य उपकेंद्रांना बीएएमएस डॉक्टर देण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर उपलब्ध झाल्याने सोयीचे झाले आहे.
आरोग्यवर्धिनी योजनेंतर्गत जिल्हय़ातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. प्राथमिक आरोग्य पेंद्रे अनेक गावांपासून दूर आहेत. तसेच प्रा. आ. केंद्रांमध्ये ओपीडीही मोठय़ा प्रमाणात असते. त्यामुळे दुर्गम भागातील गरजूंना प्रा. आ. केंद्रात यावे लागते. त्यांना उपकेंद्र पातळीवरच आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या कंत्राटी पद्धतीच्या डॉक्टरांना 40 हजार रुपये मानधन दिले जाते. तर डॉक्टर उपलब्ध नसलेल्या ठिकाणी बीएससी नर्सिंगच्या उमेदवारांना सहा महिने प्रशिक्षण देऊन त्यांची समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून उपकेंद्रांत नियुक्ती केली जात आहे.
पाठपुराव्याला यश, जनतेची सोय!
याबाबत आमदार वैभव नाईक म्हणाले, कुडाळ तालुक्मयातील वालावल, वर्दे, पांग्रड, कुसबे, वाडोस, कालेली, नेरुर नं. 1, पिंगुळी, वेताळबांबर्डे, गिरगाव, तुळसुली तर्फ माणगाव या 11 आरोग्य उपकेंद्रांत, तर मालवण तालुक्मयातील खोटले, आंबेरी, नांदरुख, वराड, सुकळवाड, हडी, देऊळवाडा, चिंदर, देवबाग या 9 आरोग्य उपकेंद्रांमध्ये बीएएमएस डॉक्टर लोकांच्या सेवेत रुजू झाले आहेत. नेमणूक झालेल्या डॉक्टरांनी नागरिकांना उत्तम प्रकारची सेवा द्यावी. नागरिकांवर खासगी दवाखान्यात जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रयत्न करावेत. आरोग्य केंद्रांमध्ये लागणाऱया सोयी सुविधा राज्य सरकारकडे पाठपुरावा करून उपलब्ध करून देण्यात येतील.