प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच सध्या ठिकठिकाणी नवीन सिग्नल यंत्रणाही कार्यान्वित झाली आहे. मात्र बसविलेल्या या सिग्नलची वेळ व्यवस्थित नसल्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचे ठरत आहे.
नव्याने बसविण्यात आलेल्या चारही बाजूच्या सिग्नलमध्ये लाल दिवा लागला असल्याने कोणता सिग्नल सुटेल याच्या प्रतीक्षेत वाहनधारकांना थांबावे लागत आहे. त्यामुळे बरोबर सर्कलच्या मधोमध वाहतुकीची कोंडी होत आहे. सिग्नल यंत्रणा व्यवस्थित सुरू नसल्यामुळे या ठिकाणी रहदारी वाहतूक पोलिसांचीही नियुक्ती केली असली तरी वाहतुकीच्या कोंडीत वाढ होतच चालली आहे.