कोरोना गंभीर स्थिती असतानाही भरतीबाबत शासनाकडून दुर्लक्ष
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाचा रत्नागिरीतील वाढता प्रभाव पाहता रत्नागिरीतील शासकीय आरोग्य यंत्रणेतील अपुऱया वैद्यकीय अधिकाऱयांनी आतापर्यंत यशस्वीरित्या जिह्याची आरोग्य व्यवस्था सांभाळली आहे. परंतु कोरोनाची येथील गंभीर स्थिती लक्षात घेत शासनाने तत्काळ पदे भरतीसंदर्भात आवश्यक कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे रिक्त असलेली वैद्यकीय अधिकाऱयांच्या पदांची तत्काळ भरतीबाबत खलील वस्ता यांच्यावतीने ऍड. राकेश भाटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
रत्नागिरीत कोरोनासंदर्भातील उपचार हे फक्त शासकीय यंत्रणेमार्फत केले जात आहेत आणि रत्नागिरीतील सिविल हॉस्पिटलमध्ये वर्ग 1 वैद्यकीय अधिकारी यांची एकूण संख्या 19 आहे. यातील 16 पदे रिक्त आहेत. तसेच रत्नागिरी जिह्यातील तालुक्यांमध्ये असणाऱया शासकीय रुग्णालयांमध्ये 11 पैकी 8 पदे रिक्त आहेत. तसेच आरोग्य संचालनालय कोल्हापूर विभाग यांनी रत्नागिरी शासकीय आरोग्य संस्थेला कोरोनासंदर्भात तात्पुरती स्वरूपाची 181 पदे निर्माण केली आहेत. परंतु त्यापैकी फक्त 34 पदे भरली गेली. यावरून रत्नागिरीतील शासकीय आरोग्य यंत्रणेमध्ये मनुष्यबळाचा अभाव असल्याचे दिसत आहे.
सद्यस्थितीला महाराष्ट्र शासनाने 31 जुलै 2020 रोजी प्रसिद्ध केलेल्या माहितीत 782 कोरोनाबाधित रुग्ण रत्नागिरी जिह्यामध्ये उपचार घेत असल्याचे स्पष्ट होत आहे. आणि त्या मानाने तुटपुंजा संख्येने असलेल्या वैद्यकीय अधिकाऱयांनी आतापर्यंत यशस्वीरित्या जिह्याची आरोग्य व्यवस्था सांभाळली आहे. परंतु कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने तत्काळ पदे भरतीसंदर्भात आवश्यक ती कारवाई सुरू केलेली नाही. जिह्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयांची स्थायी व अस्थायी स्वरूपाची पदे तत्काळ भरावीत किंवा अन्य व्यवस्था करण्यात यावा.r यास्तव मुंबई उच्च न्यायालयामध्ये खलील वस्ता यांच्यावतीने ऍड. राकेश भाटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्याची महाराष्ट्राचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या खंडपीठापुढे 7 ऑगस्ट रोजी शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.