कोल्हापूर/प्रतिनिधी
सीमाभागातील मराठी लोकांवर कर्नाटक सरकारकडून अत्याचार सुरू आहे. त्या प्रश्नावर महाराष्ट्रातील भाजपचे नेते मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे विधानसभेत निषेधाचा मांडलेला ठराव हा योग्य आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते खासदार विनायक राऊत यांनी दिली.
सीमाप्रश्नाबाबत काल राज्य सरकारने कर्नाटक सरकारच्या विरोधात निषेधाचा ठराव मांडला आहे. त्यावरून बोलताना खासदार विनायक राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे राऊत म्हणाले, कर्नाटमध्ये भाजपचे सरकार आहेत. तिथे मराठी जनतेवर अत्याचार होत असूनही राज्यातील भाजपचे नेते मूग मिळून गप्प आहेत. त्यामुळे विधानसभेत केलेला निषेधाचा ठराव योग्यच आहे. असे राऊत म्हणाले.
आम्ही देखील संसदेत याबाबत पत्र दिले. त्यावेळी भाजपने त्यावर सही करण्यास नकार दिला. यावरून भाजपचे सीमाभागातील मराठी माणसाबाबत दुटप्पी धोरण दिसून येते, असे राऊत म्हणाले.