ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्युनंतर अनेक जण बॉलीवूड मध्ये होणाऱ्या गटबाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. सुशांत वर मानसिक तणाव होता आणि त्याला चित्रपट सृष्टीने एकटे पाडले असल्याने तो नैराश्यात गेला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पोस्टमार्टेम मध्ये सुशांतने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणा बाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाष्य केले आहे. सुशांतने बॉलिवूडमधील व्यवसायिक स्पर्धेसंबंधित इतर काही कारणांमुळे नैराश्यात जावून आत्महत्या केली का? या दृष्टीने देखील मुंबई पोलीस चौकशी करतील, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.
अनिल देशमुख आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये सुशांत चा मृत्यू गळफास लावून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र मीडियाकडून सिने सृष्टीतील व्यावसायिक स्पर्धेमुळे त्याला नैराश्य आल्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मुंबई पोलिस त्या दृष्टीने तपास करतील असे म्हटले आहे.