सरकारी बँका आणि धातू क्षेत्रात जोरदार समभाग विक्री
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी बुधवारी भारतीय शेअर बाजाराने तेजीची उसळी नोंदवली आहे. यामध्ये दिवसअखरे तब्बल 1147 अंकांची भक्कम स्थिती प्राप्त केली आहे. सकाळी प्रारंभीच्याप्रसंगी 442 अंकांच्या तेजीसोबत बाजार सुरु झाला होता. हा कल कायम ठेवत शेअर बाजार बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीसोबत दिवसअखेर सेन्सेक्स 1147 अंकांनी वधारुन निर्देशांक 51,444.65 वर बंद झाला आहे. दिवसभरात सेन्सेक्सने 51,539.89 अंकांचा उच्चांक प्राप्त केला तर 50,512.84 चा निचांक नोंदवत बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 326.50 अंकांनी वधारुन निर्देशांक 15,245.60 वर बंद झाला आहे. यामध्ये दिवसभरात 15,273.15 चा उच्चांक प्राप्त केला तर 14,995.80 अंकांची निचांकी पातळी नोंदवत बंद झाला आहे.
बुधवारच्या सत्रात गुंतवणूकदारांचा कल हा सरकारी बँका आणि धातू क्षेत्राकडे राहिला आहे. यामध्ये निफ्टीमधील सार्वजनिक बँका आणि धातूचा निर्देशाक हा 3ते 3 टक्यांच्या वाढीसोबत बंद झाला आहे. दुसऱया बाजूला वाहन क्षेत्रातील विक्रीसोबत वाहन क्षेत्राचा निर्देशांक हा 0.66 टक्क्यांच्या घसरणीसह 10,673.10 वर बंद झाला आहे.
भारतीय शेअर बाजारात दुपारनंतर वाढीसोबत बीएसईमधील धातू आणि बँक फायनान्सचा निर्देशांक 2.3 टक्क्यांवर वधारला आहे. गुंतवणूकदारांनी असेट मॅनेजमेंट, हाऊसिंग फायनान्स कंपन्यांच्या समभागाची जोरदार खरेदी झाली आहे.
जागतिक पातळीवरील प्रभाव आंतरराष्ट्रीय प्रमुख बाजारामध्ये चीन, जपान, कोरिया यांच्यासह हाँगकाँगमधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी जोरदार समभाग खरेदी केली आहे. याचा प्रभाव देशातील शेअर बाजारावर सकरात्मक राहिल्याचे अभ्यासकांनी नमूद केले आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी मंगळवारपर्यंत भारतीय भांडवली बाजारात 2,223.16 कोटी रुपयाच्या समभागाची निव्वळ खरेदी केली आहे.