पूरसदृश स्थिती कायम : नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात अतिवृष्टी सुरूच असून पूरसदृश स्थिती कायम आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तिलारी धरणाचे चारही दरवाजे उघडल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. अतिवृष्टीमुळे भातशेती, घरे, गोठय़ांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.
दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस 19 जुलैपर्यंत पडणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासात सर्वच तालुक्मयात शतकी सरासरीने पाऊस पडला. मालवण तालुक्मयात सर्वाधिक (198 मि. मी.) पाऊस झाला आहे. तर जिल्हय़ात आतापर्यंत 1853 मि. मी. च्या सरासरीने पाऊस पडला आहे.
जिल्हय़ात 19 जुलैपर्यंत अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अतिवृष्टीमुळे सर्वच नदी-नाल्यांना पूर आला असून ग्रामीण भागातील काही रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शेतीचेही फार मोठे नुकसान झाले आहे. कुडाळ आंबेडकरनगर येथे पाणी भरल्याने काही कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हय़ात सर्वत्र मुसळधार पाऊस
सर्वच तालुक्मयांमध्ये पावसाचे शतक झाले असून गेल्या चौवीस तासात सरासरी 156.72 मि. मी. पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस मालवण तालुक्मयात 198 मि. मी. नोंद झाली आहे. 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 1853.03 मि. मी. पाऊस झाला आहे.
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 140 (1895), सावंतवाडी – 190 (2076.10), वेंगुर्ले – 159.80 (1577.20), कुडाळ – 164 (1756), मालवण – 198 (2118), कणकवली – 146 (1930), देवगड – 144 (1687), वैभववाडी – 112 (1865), असा पाऊस झाला आहे.
दिनांक 1 जूनपासून आजपर्यंत सर्वाधिक पाऊस मालवण तालुक्मयात (2 हजार 118 मि. मी.) झाला असून सर्वात कमी पाऊस वेंगुर्ले तालुक्मयात (1 हजार 577 मि. मी.) झाला आहे.