पाणीपुरवठा मंडळातील कर्मचाऱयांचा इशारा, जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही काम करत असताना केवळ 11 हजार ते 13 हजारपर्यंत वेतन दिले जात आहे. यामध्ये आम्हाला काम करणे अशक्मय आहे. या वेतनामध्ये वाढ करावी यासाठी आम्ही काम बंद आंदोलन केले. तेव्हा आम्हाला वेतन वाढविण्याचे आश्वासन दिले होते. चार महिने उलटले तरी वाढ केली नाही. त्यामुळे शनिवारपर्यंत वेतन वाढवा, अन्यथा सोमवारपासून पुन्हा काम बंद करणार, असा इशारा पाणीपुरवठा मंडळातील कर्मचाऱयांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदनाद्वारे दिला आहे.
गेल्या सप्टेंबर 2021 मध्ये सलग तीन दिवस आम्ही पाणी पुरवठा करण्याचे काम बंद केले होते. त्यामुळे शहरातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागला होता. त्यावेळी महापालिका आयुक्त, लोकप्रतिनिधी तसेच पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी आम्हाला आश्वासन दिले, तुमची ही समस्या तातडीने सोडवू, तेव्हा पुन्हा कामाला लागा, असे सांगितले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आम्हाला किमान सरकारी कर्मचाऱयांप्रमाणे वेतन द्यावे. त्यामुळे आम्ही चांगले जीवन जगू शकतो, असे या निवेदनात म्हटले आहे.
पाणीपुरवठा मंडळामध्ये एकूण 359 जण आम्ही काम करत आहे. आता पाणीपुरवठा मंडळाने एल अँड टी कंपनीकडे आम्हाला वर्ग केले आहे. मात्र, वेतन वाढविण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. तेव्हा आता तातडीने वेतन वाढवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असे या निवेदनात म्हटले आहे. मध्यंतरी अधिवेशन, निवडणूक आहे, असे कारण आम्हाला सांगितले होते. मात्र, आता पुन्हा याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. तेव्हा तातडीने वेतन वाढवा. अन्यथा आंदोलन करू, असा इशारा पुन्हा देण्यात आला आहे.
शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुब्रमण्यम कांबळे, मंजुनाथ दोडवाड, शिवानंद अक्की, सुनीता यळ्ळूरकर, सदाशिव बेन्नी, परशराम कोकणी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.