ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या मुलांची भेट घेतली. या भेटीत मोदींनी मुलांना यशस्वी जीवनाचा मंत्र दिला. आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग सांगितला. मोदींनी मुलांना अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी मोदींनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींसमोरच ‘सास भी कभी बहू थी’ या मालिकेचाही उल्लेख केला आणि उपस्थितांमध्ये हास्याचे कारंजे उडाले.
मोदी म्हणाले, तुमच्या शौर्याची गोष्ट ऐकून माझ्यासह प्रत्येकालाच अभिमान वाटतो. देशातील सर्व मुलांच्या शौर्याच्या गोष्टी जगासोबत शेअर करेन.
मोदींनी मुलांना विचारले तुमच्यापैकी किती जण पाणी औषधासारखे पितात? ते म्हणाले, काही जण तर पाणी ज्यूस पिल्यासारखे पितात. तर काही जण पाणी औषधासारखे गटागटा पितात. ते म्हणाले, पाणी चवीने पिले पाहीजे. पाण्याला पण स्वतःची चव असते. पाणी आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे. पाणी औषधासारखे नाही तर पाण्याचा आनंद घेत पिले पाहीजे.
पुढे ते म्हणाले, राष्ट्रीय पुरस्कारांची व्याप्ती वाढवली आहे. पुरस्कारप्राप्त मुलांवर साऱया देशाचं लक्ष जातं. तुम्ही सगळे त्यांचे हिरो बनता तसेच जेव्हा तुम्ही काही यश प्राप्त कराल, तेव्हा आपलं लक्ष काय आहे हे विसरू नका. संधीच्या शोधत राहा. मेहनत करण्यास कधीही घाबरू नका, असं त्यांनी सांगितलं.