स्वच्छतागृहांची दुरवस्था, पी. के. क्वॉर्टर्स परिसरात अस्वच्छता
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील कचऱयाची उचल करणे, गटारी स्वच्छ करणे अशी विविध कामे करून नागरिकांच्या आरोग्य हितासाठी स्वच्छता कामगार नेहमीच कार्यरत असतात. मात्र संपूर्ण शहराची स्वच्छता करणाऱया स्वच्छता कामगारांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. पी. के. क्वॉर्टर्स येथील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून, क्वॉर्टर्स परिसरात गवत वाढले आहे. त्यामुळे याकडे महापालिकेचे अधिकारी लक्ष देतील का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
शहराच्या स्वच्छतेसाठी महापालिकेकडून कोटय़वधी निधी खर्ची घातला जातो. स्वच्छतेसाठी मनपाचे स्वच्छता कर्मचारी नेहमी कार्यरत असतात. घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करणे, गटारी स्वच्छ करणे, स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवणे अशा विविध जबाबदाऱया स्वच्छता कामगारांवर सोपविल्या आहेत. त्यामुळे दररोज सकाळपासून दिलेल्या वेळेपर्यंत हे काम करावे लागते. मात्र कामगारांच्या आरोग्याच्यादृष्टीने मनपाकडून कोणतीच खबरदारी घेतली जात नाही. शहर स्वच्छ ठेवणाऱया स्वच्छता कामगारांनाच अस्वच्छता आणि समस्यांच्या विळख्यात रहावे लागत आहेत.
स्वच्छता कामगारांना विविध सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाकडून योजना राबविण्यात येतात, असे सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात स्वच्छता कामगारानांच अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्वच्छता कामगारांच्या हितासाठी सफाई कामगार आयोग, तसेच विविध संघटना कार्यरत आहेत. समस्यांचे निवारण करण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जातो. तरीदेखील स्वच्छता कामगारांना सुविधा मिळत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. पी. के. क्वॉर्टर्स परिसरात अनेक समस्या निर्माण झाल्या असून परिसरात गवत वाढले आहे. गवत हटविण्याच्या दृष्टीने तसेच हा परिसर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने मनपाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. स्वच्छता कामगारांच्या समस्यांकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. मात्र महापालिका कार्यालयात सफाई कामगारांसाठी घेण्यात येणाऱया बैठकीत विविध माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे प्रशासनाने स्वच्छता कामगारांना प्रथम नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.