नाले कचऱयाने तुडुंब; पाण्याचा निचरा होणे कठीण : पावसाळय़ात समस्या निर्माण होण्याची शक्मयता
प्रतिनिधी / बेळगाव
दोन दिवसांपूर्वी झालेल्या केवळ अर्धातासाच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले. अनेक दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरले. स्मार्ट सिटीच्या कामांमुळे पहिल्या पावसातच समस्या निर्माण झाल्या आहेत. आता शहरातील नाले डोकेदुखी ठरणार आहेत. कारण त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात कचरा फेकण्यात आला आहे. त्यामुळे नाले तुडुंब झाले असून जोरदार पाऊस झाल्यानंतर पाण्याचा निचरा होणे कठीण जाणार आहे. त्यामुळे यावषी शहराला पुराचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. तेव्हा तातडीने नाले साफ करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
या समस्येला जनताही कारणीभूत आहे. कारण नाल्यात कचरा टाकण्याऐवजी कचराकुंडीमध्ये टाकल्यास बेळगावच्या काही भागांमध्ये येणारा महापूर थांबेल, हे निश्चित आहे. मात्र प्रत्येकाने याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये लेंडी नाला आणि बळ्ळारी नाला म्हणजे कचरा वाहू नाले झाले आहेत. त्यामुळेच शेतकऱयांना आणि शहराला फटका बसत आहे. वेळीच जनतेने सावध होणे गरजेचे आहे. अन्यथा शहरातील काही भागाला मोठा फटका बसण्याची भीती नाकारता येत नाही. शहरातील पाण्याचा निचरा होणे कठीणच आहे. कारण नाले अरुंद आणि स्मार्ट सिटीची कामे अर्धवट असल्यामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. या नाल्यांमधून पाण्याचा निचरा होत नसल्याने शहरातील काही भागाला महापूर येत आहे. महत्त्वाचे म्हणजे या नाल्यांशेजारी असणारी शेतजमीन नापीक होत असल्याची चिंता शेतकऱयांना आहे.
गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे लेंडी नाल्याचे पाणी शेतात शिरल्यामुळे बळीराजाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. याचबरोबर समर्थनगर, शास्त्राrनगर, शिवाजी उद्यान परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरले. बऱयाच वर्षांपासून या नाल्याची खोदाई झाली नाही. ही बाब खरी असली तरी जनतेने या नाल्यामध्ये फेकलेला कचरादेखील तितकाच कारणीभूत ठरत आहे. लेंडी नाल्याच्या आणि बळ्ळारी नाल्याच्या पाण्यामुळे बळीराजाला दरवषीच फटका बसत आहे. मागील दोन वर्षांपासून तर नाला फुटून मोठय़ा प्रमाणात शिवारात पाणी शिरते. पाच ते सहा ठिकाणी नाला फुटला होता. फुटलेला नाला दुरुस्त करण्यात आला आहे. मात्र यावषीही अधिक पाऊस झाला तर फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
शिवारातील पिकांनाही बसतोय फटका
या नाल्यांवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे नाल्यांचे रुंदीकरण करणे महत्त्वाचे असून काही शेतकऱयांनी केलेल्या अतिक्रमणामुळेच ही समस्या उद्भवत आहे. या नाल्यांच्या बाजूने झाडेझुडुपे वाढली असून ठिकठिकाणी काचेच्या बाटल्यांचा खचही पडला आहे. या नाल्यांतून पाण्याचा निचरा होत नसल्याने हे नाले फुटून शिवारात पाणी शिरते. त्यामुळे शिवारातील सर्व पिके खराब होत आहेत.
समर्थनगर परिसरातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
समर्थनगर व इतर परिसरात नाल्याचे पाणी शिरत असल्यामुळे जनतेच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या परिसरात नेहमी दुर्गंधी पसरलेली असते. राष्ट्रीय महामार्गापर्यंत हा नाला अरुंद झाल्यामुळे नाल्याला मागीलवषी तीन ते चार ठिकाणी भगदाड पडले होते. त्यामधून पाणी शिवारात शिरले आणि संपूर्ण शिवारच खराब झाले. तेव्हा यावषी तरी या नाल्यांची साफसफाई होणे गरजेचे आहे.