अदा खानने अनेक वर्षं कामालाच सर्वस्व मानलं. तिला कामाशिवाय दुसरं काही सुचतच नव्हतं. पण अचानक आलेल्या गंभीर आजारपणामुळे तिचे डोळे उघडले. आयुष्यात कामाशिवाय इतरही बरंच काही आहे याची जाणीव तिला झाली. कदाचित उद्या कधी येणारच नाही, असं तिला वाटून गेलं. मग येणारा प्रत्येक क्षण समरसून जगायचं असं तिने ठरवून टाकलं. आयुष्यातल्या या टप्प्याबद्दल अदा व्यक्त होते. ती म्हणते, ‘नागीन 2’ संपल्यानंतर मी आजारी पडले. मला डिहायड्रेशनचा खूप त्रास झाला. रुग्णालयात दाखल व्हावं लागलं बरं नसतानाही मी ‘विष या अमृत, ः सितारा’ या मालिकेत काम केलं. त्यावेळी ‘कानपूरवाले खुरानाज’ या मालिकेचं शूटिंगही सुरू होतं. एकाच वेळी दोन डेली सोप्स करत असल्यामुळे मला आजारपणातून बरं व्हायला अजिबात वेळ मिळाला नाही. आपण कामाव्यतिरिक्त आयुष्यात दुसरं काहीच केलं नाही हे मला त्यावेळी जाणवलं. मी आयुष्यात काहीच बघितलं नाही, असं मनात येऊन गेलं. मी भरपूर काम करून पैसे साठवू शकते किंवा प्रत्येक क्षण समरसून जगू शकते, या दोन्हीपैकी मला एकाची निवड करायची होती. मी दुसर्या पर्यायाची निवड करायचं ठरवलं.
अदा पुढे म्हणते, आता मी सारख्या मालिका करत नाही. स्वतःसाठी वेळ काढते. फिरण्याची आवड जोपासते. गेल्या तीन
महिन्यांमध्ये मी भरपूर फिरले. ‘सितारा’ संपल्यानंतर मी युरोपला गेले. भरपूर मजा केली. आजारपणातून मला खूप काही शिकायला मिळालं. फक्त काम हेच सर्वस्व नाही हे मी जाणलं. स्वतःवर प्रेम करणं खूप गरजेचं आहे. हे मला आजारपणामुळे शिकता आलं. आपल्या आवडीनिवडी जपणं खूप गरजेचं आहे हे मी जाणलं. आज मी खूप आनंदात आहे. माझं आयुष्य आनंदाने जगते आहे. प्रत्येकाने आपलं आयुष्य आनंदाने जगायला हवं.
अदा खान, अभिनेत्री