गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई. , हरणाई सुतगिरणीला सदिच्छा भेट.
वार्ताहर / औंध
अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून रणजितसिंह देशमुख यांनी हरणाई सुतगिरणी उभी केली आहे. दुष्काळी तालुक्यातील बेरोजगार तरुणासाठी तारणहार ठरलेल्या हरणाई आणि माणदेशी सुतगिरणीला शासनस्तरांवर सर्वोतोपरी सहकार्य करु अशी ग्वाही गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली.
गृहराज्यमंत्री ना.शंभुराज देसाई यांनी हरणाई सहकारी सुतगिरणीला सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते हरणाई सहकारी सुतगिरणीचे संस्थापक चेअरमन रणजितसिंह देशमुख (भैय्यासाहेब) रणधीर जाधव, मामुशेठ वीरकर,बाबा गोसावी, अनिल सुभेदार, ?ड.अजित घाडगे,शेखर जाधव,संजय देशमुख,मारुती पवार,सज्जाद शेख निलेश घार्गे जनरल मँनेजर रमेश भोसले प्राँडक्शन मँनेजर अम्रुत मट्टकली यांची प्रमुख उपस्थिती होती.
गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले की खटाव-माण दुष्काळी भागात सुतगिरणीच्या माध्यमातून औद्योगिक विकासाचे दालन उभे केले आहे. केवळ व्यावसायिक द्रुष्टिकोन न ठेवता नैसर्गिक आपत्तीच्या काळात सामान्य शेतकयांच्या हितासाठी चारा छावण्या सुरू करून या उद्योग समुहाने दिशादर्शक काम केले आहे. हे कधीही विसरता येणार नाही. शासनाच्या माध्यमातून वस्त्राsद्योग व्यावसायिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी सहकार्य करेन अशी ग्वाही त्यांनी दिली.
रणजितसिंह देशमुख यांनी प्रास्ताविक करून सुतगिरणीची माहिती दिली. यावेळी गृहराज्यमंत्री ना. देसाई यांचा हरणाई उद्योग समुहाचे वतीने सत्कार करण्यात आला.
निलेश घार्गे देशमुख यांनी आभार मानले.