शेतकरी लढा देण्यासाठी झाले सज्ज
प्रतिनिधी /बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्त्याला न्यायालयाने स्थगिती दिली असताना आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वरि÷ न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानंतर पुन्हा शेतकऱयांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. न्यायालयाकडून नोटिसा पाठविण्यात आल्यामुळे आता शेतकऱयांना त्या विरोधात पुन्हा लढा द्यावा लागणार आहे. यापुढेही संघटीतपणे लढा देण्याची गरज निर्माण झाली आहे.
हलगा-मच्छे बायपास रस्ता तिबारपिकी जमिनीतून करण्यात येत होता. त्यामुळे शेतकऱयांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. मात्र पोलीस फौजफाटा घेऊन मध्यंतरी पुन्हा या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु शेतकऱयांनी न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने न्यायालयासमोर आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ते शक्मय झाले नाही. शेतकऱयांच्या बाजूने ऍड. रवीकुमार गोकाककर यांनी ठामपणे बाजू मांडून शेतकऱयांना दिलासा दिला आहे.
आता पुन्हा मुख्य उच्च दिवाणी न्यायालय आणि सीजेएम न्यायालयाकडून शेतकऱयांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. सोमवारी याबाबत 11 वाजता शेतकऱयांना पुन्हा आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. त्यामुळे काही शेतकऱयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
असे असले तरी शेतकऱयांनी संघटीतपणे लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. सुपीक जमिनीऐवजी इतर ठिकाणांहून हा रस्ता करावा, अशी मागणी वारंवार करण्यात आली आहे. तरीदेखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
हलगा ते मच्छेपर्यंत हा रस्ता करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू करण्यात आले होते. शेतकऱयांनी वेळोवेळी त्याला तीव्र विरोध केला आहे. उभ्या पिकांमध्ये जेसीबी घालून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्ता करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही काही शेतकऱयांच्या मुलांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त झाला होता. न्यायालयानेही या रस्त्याला स्थगिती दिली आहे. असे असताना पुन्हा वरि÷ न्यायालयाने शेतकऱयांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे शेतकऱयांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता शेतकऱयांना पुन्हा न्यायालयीन लढाई लढावी लागणार आहे.