के. व्ही. स्टेशनमध्ये बिघाड, तालुक्मयात वीजपुरवठय़ाचे तीनतेरा, नागरिकांमधून संताप
प्रतिनिधी /बेळगाव
हिंडलगा येथील 33 केव्ही स्टेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे रविवारी ग्रामीण भागात तब्बल तीन तास वीजपुरवठा ठप्प होता. केवळ एकाच विभागात नव्हे तर तालुक्मयाच्या सर्वच गावांमध्ये विजेचे तीनतेरा वाजले आहेत. हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. रविवारी अनेक गावांमध्ये यात्रोत्सव होता. परंतु या दरम्यानच वीजपुरवठा नसल्याने अंधारात यात्रोत्सव साजरा करावा लागल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
रविवारी आंबेवाडी गावात घळगेश्वर यात्रेनिमित्त इंगळय़ांचा कार्यक्रम होता. सायंकाळी 7.30 वा. वीजपुरवठा ठप्प झाला. यामुळे नागरिकांना बॅटरीच्या सहाय्याने यात्रा करावी लागली. रात्री 10.30 वा. वीजपुरवठा सुरू करण्यात आला. परंतु 3 तास वीज नसल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. आंबेवाडीसह हिंडलगा, मण्णूर, अलतगा, कंग्राळी खुर्द, गोजगा या भागात वीजपुरवठा ठप्प होता.
मागील आठवडय़ात बसवण कुडची गावची यात्रा झाली. या यात्रा काळातही विजेचा खेळखंडोबा सुरूच होता. यामुळे तालुक्मयात हेस्कॉमच्या नियोजनाचा अभाव दिसून येत आहे.
येळ्ळूर विभागात विजेचा खेळखंडोबा
मागील आठवडय़ात बेळगाव तालुक्मयात वारा व पाऊस झाला. त्यामुळे बऱयाचशा गावात वीजपुरवठा ठप्प होता. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला येळ्ळूर विभागात वीजपुरवठा ठप्प होता. ती संपूर्ण रात्र नागरिकांनी विजेविना घालविली. याचबरोबर दिवसातून 5 ते 6 वेळा वीजपुरवठा खंडित केला जात असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सुरळीत वीजपुरवठा नसल्याने याचा फटका स्थानिक उद्योग व व्यवसायांना बसत आहे. दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱया व्यवसायांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.
सुरळीत वीजपुरवठय़ासाठी सूचना
रविवारी हिंडलगा येथील वीज केंद्रात बिघाड झाल्यामुळे काही गावांमध्ये वीजपुरवठा ठप्प होता. रात्री उशिरा कर्मचाऱयांनी दुरुस्ती करत वीजपुरवठा सुरळीत केला. मध्यंतरी झालेल्या वारा, पावसामुळे बरेचसे नुकसान झाले होते. या पुढील काळात सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी अधिकारी वर्गाला सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती गिरीधर कुलकर्णी यांनी दिली.
– गिरीधर कुलकर्णी (अधीक्षक अभियंता, हेस्कॉम)