वळिवाच्या दणक्मयाने दाणादाण : वादळी वाऱयासह दमदार पावसाने झाडे कोसळून ठिकठिकाणी नुकसान : नागरिकांची तारांबळ
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या आठ दिवसांपासून उष्म्यामध्ये वाढ झाली होती. त्यामुळे पावसाची दाट शक्मयता होती. बुधवारी सायंकाळी शहरासह ग्रामीण भागाला वळिवाने झोडपून काढले. यामुळे साऱयांचीच दाणादाण उडाली. शहरासह ग्रामीण भागामध्ये झाडे कोसळून घरे, वाहनांचे नुकसान झाले. झाडांबरोबरच वीजखांब कोसळल्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. या पावसामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली. ग्रामीण भागामध्ये दमदार पाऊस कोसळला तर शहरामध्येही मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळला. यामुळे व्यापारीवर्गाची चांगलीच तारांबळ उडाली.
जोरदार वाऱयासह ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान पावसाचे आगमन झाले. जोरदार वाऱयामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. भाग्यनगर आठवा आणि सातवा क्रॉस येथे झाडे कोसळल्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला. यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला होता. ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी झाडे कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
बुधवारी सकाळपासूनच उष्म्यामध्ये मोठी वाढ झाली होती. सायंकाळी झालेल्या दमदार पावसामुळे हवेमध्ये काहीकाळ गारवा निर्माण झाला होता. जोरदार वाऱयासह झालेल्या पावसामुळे बाजारहाटासाठी आलेल्या अनेकांना आडोसा शोधावा लागला. दुचाकीस्वारांना आपली वाहने रस्त्यावरच पार्किंग करून आडोसा शोधावा लागला. त्यामुळे पाऊस जाईपर्यंत अनेकांना ताटकळत थांबावे लागले.
पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. शहरातील विविध ठिकाणी व रस्त्यांवर तलावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. नागरिकांना भिजतच आपली घरे गाठावी लागली. साचलेल्या पाण्यातून वाहनचालकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत होती. सध्या स्मार्ट सिटीची कामे अर्धवट आहेत. रस्त्यांवरच माती टाकली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी चिखल झाला होता. या पावसामुळे गटारीत कचरा अडकून पाणी रस्त्यांवरून वाहत होते. पावसामुळे गटारीतील प्लास्टिक पिशव्या व इतर साहित्य रस्त्यांवर आले होते. यामुळे वाटसरूंना वाट काढणेही कठीण बनले होते.
भाजी विपेते-व्यापाऱयांना फटका
शहरातील भाजी विपेते, फळ विपेते यांना मोठा त्रास सहन करावा लागला. रस्त्यांवरून पाणी वाहत असल्यामुळे भाजी आणि फळे कोठे ठेवायची, हा प्रश्न त्यांच्यासमोर पडला. याचबरोबर भिजतच त्यांना आवराआवर करावी लागत होती. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनाही पावसामुळे त्रास सहन करावा लागला.
खडेबाजार, मारुती गल्ली, गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, भेंडीबाजार, रविवार पेठ, कलमठ रोड या परिसरात गटारी तुडुंब भरून पाणी रस्त्यांवरून वाहत होते. बाजारपेठेत तर या पावसामुळे दलदल निर्माण झाली होती. शहराबरोबरच उपनगरांमध्येही अनेक ठिकाणी पाणी साचून होते. त्यामुळे नागरिकांना पाण्यातूनच वाट काढावी लागत होती.
जुन्या महात्मा फुले रोडवरील फर्निचर अड्डय़ावर कोसळले झाड
जोरदार वारा आणि पावसामुळे विलायती चिंचेचे झाड जुन्या महात्मा फुले रोडवरील दान्नम्मा मंदिरासमोर असलेल्या फर्निचर अड्डय़ावर कोसळले. सुदैवानेच या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, जवळपास दीड लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.
आनंदवाडीत कारवर कोसळले झाड
आनंदवाडी येथे झाडाखाली पार्किंग करण्यात आलेल्या कारवरच झाड कोसळल्याने कारचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला.
भाग्यनगर परिसरात झाडांची पडझड
भाग्यनगर परिसरात सातवा, आठवा क्रॉस येथे झाडे कोसळली. रस्त्यांवरच झाडे कोसळल्यामुळे रस्ते पूर्णपणे बंद झाले. वीजतारांवरही एक झाड कोसळले. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. वळिवाच्या जोरदार पावसामुळे या परिसरात पाणीच पाणी झाले
होते.
सुळगा-हिंडलगा येथे नारळाचे झाड कोसळून मोठे नुकसान
बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील सुळगा-हिंडलगा येथे नारळाचे झाड घर आणि कारवर कोसळल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी विजेच्या खांबावरही हे झाड कोसळल्यामुळे खांब कोसळला. सुदैवानेच या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या घटनेत भावकू भैरू पाटील यांच्या घराचे आणि कारचे मोठे नुकसान झाले आहे. तातडीने वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
दाणे गल्ली येथे दुचाकींचे नुकसान
दाणे गल्ली, शहापूर येथे झाड कोसळून जवळपास 7 दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला. जोरदार पाऊस आणि वाऱयामुळे केशव व्यायाम शाळेसमोरील झाड कोसळल्यामुळे अनेक दुचाकींचे नुकसान झाले आहे.
ग्रामीण भागातही जोरदार पाऊस
ग्रामीण भागातही जोरदार वाऱयासह पावसाचे आगमन झाले. त्यामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली. येळ्ळूर, सांबरा, हिंडलगा आदी परिसरात मोठा पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडे कोसळून मोठे नुकसान झाले.
म. फुले रोडवरील तुकाराम बँकेजवळ झाड कोसळले
जोरदार वाऱयामुळे म. फुले रोडवरील तुकाराम बँकेजवळील एक मोठे झाड कोसळले आहे.
खडेबाजार शहापुरात घरावर कोसळले झाड
पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. अशाच प्रकारची एक घटना खडेबाजार शहापूरमध्ये घडली. येथील मिलिंद रामचंद्र जाधव आणि शिराळकर यांच्या घरांवर नारळाचे झाड कोसळल्याने दोन्ही घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
नारळाच्या तीन झाडांवर सांबरा येथे वीज कोसळली
सांबरा येथे बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पडलेल्या विजेमुळे नारळाच्या तीन झाडांना आग लागली. अग्निशमन दलाच्या बंबांनी तातडीने घटनास्थळी येऊन आग विझवली.
सांबरा परिसरामध्ये बुधवारी सायंकाळी ढग दाटून आले. त्यानंतर वादळी वारा व विजांचा कडकडाट सुरू झाला. तुरळक स्वरुपाच्या पावसाला प्रारंभ झाला. याचवेळी भैरूदेव चौकमधील सुभाष हडपद यांच्या परसातील नारळाच्या तीन झाडांवर वीज पडली व बघता बघता तिन्ही झाडांनी पेट घेतली. यावेळी ग्रामस्थांनी हे दृश्य पाहण्यासाठी एकच गर्दी केली. त्यानंतर लागलीच सांबरा विमानतळावरील अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी लगेच आगीवर नियंत्रण मिळविले.
धामणे परिसरात वादळी वाऱयासह पाऊस पडल्याने मोठे नुकसान
धामणे व परिसरात बुधवारी दुपारी अचानक वादळी वारा आणि मुसळधार पाऊस पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. सोसाटय़ाच्या वादळी वाऱयाने धामणे हट्टी रस्त्यानजीक असलेल्या यल्लाप्पा चौगुले यांच्या घराचे पत्रे उडून गेल्याने घरातील साहित्य उघडय़ावर पडले आहे.
घरात ठेवलेली भात भरलेली 40 पोती पावसात भिजून नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे सोसाटय़ाच्या वाऱयाने शेतातील झाडे पडली असून अनेक झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर पडल्याने गावातील विद्युतपुरवठा बंद पडल्याने रात्री उशिरापर्यंत लाईनमन विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत होते.