कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीचा प्रभाव- ग्राहकांची चिंता वाढणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या तापमानाचा वेग वाढत आहे, परंतु याचसोबत आता ग्राहकांना महागाईचाही फटका नवीन आर्थिक वर्षापासून बसणार असल्याचे संकेत आहेत. दररोजच्या वापरात असणाऱया वस्तूंच्या किमती येत्या 1 एप्रिलपासून महागणार असल्याची माहिती आहे. प्रामुख्याने एसी, टीव्ही, वाहने आणि स्मार्टफोन यांच्या किमती वाढण्याचा अंदाज आहे.
इलेक्ट्रॉनिक उत्पादने ः सर्वत्र वातावरणातील उष्णता वाढत असल्यामुळे फ्रीज, कुलर, एसीसह अन्य सेगेमेंटमधील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढणार आहेत. यासंदर्भात यापूर्वी कंपन्यांकडून तशी घोषणा करण्यात आली आहे. कच्चा माल आणि उत्पादनाच्या वाढत्या खर्चामुळे कंपन्यांना इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या किंमती वाढवाव्या लागत आहेत.
स्मार्टफोन महागणार ः अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पावेळी स्थानिक मोबाईल पार्ट्स, मोबाईल चार्जर आणि ऍडॉप्टर, गॅजेट्स बॅटरी, हेडफोन याच्यावरील आयात शुल्क 2.5 टक्क्यांनी वाढविण्याची घोषणा केली होती. यामुळे स्मार्टफोनच्या किमती जवळपास 500 रुपयांपेक्षा अधिक वाढण्याचे संकेत आहेत.
कार्सच्या किमती वधारणार ः देशातील सर्वात मोठय़ा कार निर्मिती कंपन्या मारुती आणि निस्सान इंडिया आपल्या कारच्या किमती 1 एप्रिलपासून वाढविण्याच्या तयारीत आहेत. कारण कार निर्मिती करणाऱया कंपन्यांना सध्याला कच्च्या मालासाठी जादा किंमत मोजावी लागत आहे. यामुळे कारच्या किमती जवळपास 3 ते 5 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
दुचाकीही होणार महाग ः देशातील प्रमुख दुचाकी निर्मिती करणारी कंपनी हिरो मोटोकॉर्प आपल्या दुचाकीच्या किमती 2500 रुपयांपर्यंत वाढविण्याचा अंदाज आहे. यामध्ये मोटारसायकल आणि स्कूटर या मॉडेलचा समावेश होणार असल्याचे कंपनीने नमूद पेले आहे.
हवाई प्रवास महागणार ः हवाई प्रवास आता महाग होणार आहे. कारण हवाई सुरक्षा शुल्क वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे 1 एप्रिलपासून हवाई वाहतूक महाग होणार आहे. सरकारने देशातील प्रवाशांसाठी एएसएफ शुल्क 160 रुपयानी वाढवून 200 रुपये केले आहे.