कमीत कमी रक्कम ठेवणे यापुढे अनिवार्य
नवी दिल्ली
: येत्या जुलै महिन्याच्या 1 तारखेपासून बँकिंग संदर्भात असलेल्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये एटीएममधून रोख रक्कम काढणे आणि खात्यावर कमीत कमी शिल्लक रक्कम ठेवण्यासोबत अन्य नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. यासह पंजाब नॅशनल बँकेतही बचत खात्यावर मिळणाऱया व्याजात बदल करण्यात येणार आहे. हा क्याजदर 0.50 टक्क्मयांनी कमी करण्यात येणार असून हा नियम येत्या 1 जुलैपासून लागू करण्यात येणार आहे. तसेच बचत खात्यामध्ये जास्तीत जास्त 3.25 टक्के वार्षिक पातळीवर व्याज देण्यात येणार आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे एटीएममधून पैसे काढण्यासाठी जी शिथिलता दिली होती, ती आता मिळणार नाही. सरकारने एटीएममधून पैसे काढल्यानंतर सर्व व्यवहारावरील शुल्क हटविले होते. मात्र तीन महिन्यांसाठी सवलत दिली असल्याचे स्पष्ट केले असून यावरील शुल्क येत्या 1 जुलैपासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
आणखीन तिसरा नियम म्हणजे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी आवाहन केल्यानंतर बचत खात्यावरील कमीत कमी रक्कम अनिवार्य केली नव्हती. परंतु हा नियम एप्रिल ते जूनपर्यंतच होता. यामुळे येत्या जुलैपासून ग्राहकांनी आपल्या खात्यावर कमीत कमी रक्कम ठेवणे सक्तीचे होणार असल्याचे सरकारने सांगितले आहे.