दरवर्षी विध्यार्थ्यांना विद्यानिधी शिष्यवेतन दिले जात आहे. त्याप्रमाणेच यंदाही विध्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याची घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे.
मच्छिमारी करणाऱ्याच्या मुलांना व कुंभार व्यवसाय करण्यांच्या मुलांना लवकरच ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. सध्या ११ लाख मुलं या योजनेचे लाभ घेत असून आगामी काही दिवसात कामगारवर्गाच्या सर्व मुलांना शिष्यवेतन दिले जाणार आहे.
ही योजना ग्रामीण भागातील मुलांना फायदेशीर ठरणार आहे. शेतकरी आणि श्रमिक वर्ग आर्थिकदृष्ट्या सबल बनायला मददगार होते. यामुळेच देशाचा विकास होऊ शकते. अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.