नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या तीन वर्षांमध्ये 117 चीनी नागरीकांना त्यांच्या मायदेशात परत जाण्यास भाग पाडण्यात आले आहे. तसेच 81 चीनी नागरीकांना भारत सोडण्यासाठी नोटीसा देण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत मंगळवारी दिली. या नागरीकांनी भारतात नियमभंग केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. 726 चीनी नागरीकांना ‘विरोधी सूचीत’ स्थान देण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी प्रश्नोत्तर तासात दिली. काही चीनी नागरीक व्हिसाचा कालावधी संपल्यानंतरही भारतात वास्तव्य करुन होते. त्यांना एकतर त्यांच्या देशात परत पाठविण्यात आले आहे किंवा नोटीस दिली आहे.