मोरबी झुलता पूल दुर्घटना ः ‘ओरेवा’ कंपनीवर गुन्हा दाखल
मोरबी / वृत्तसंस्था
गुजरातमधील मोरबी येथे घडलेल्या झुलता पूल कोसळण्याच्या हृदयद्रावक दुर्घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. अपघातग्रस्त पुलाच्या व्यवस्थेची जबाबदारी पाहणाऱया ‘ओरेवा’ कंपनीने अतिकमाईच्या हव्यासाने एकाचवेळी अधिकाधिक जणांना तिकीटशुल्क आकारून पुलावर प्रवेश दिल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, याप्रकरणी संबंधित कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱयांवर कारवाई सुरू केली असून आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. घटनेच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.
मोरबी येथे झुलता पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या सोमवारी 150 च्या वर पोहोचल्याचे गुजरात पोलिसांच्या एका वरि÷ अधिकाऱयाने सांगितले. अजूनही काही लोक बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी सोमवारी सायंकाळपर्यंत बचावकार्य सुरू होते. पोलिसांनी केबल ब्रिजच्या देखभाल आणि ऑपरेशनमध्ये गुंतलेल्या कंपनीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. शहरातील घडय़ाळे आणि ई-बाईक बनवणाऱया ओरेवा ग्रुपला पुलाचे नूतनीकरण आणि कामाचे कंत्राट देण्यात आले होते, असे मोरबी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीपसिंह जाला यांनी सांगितले. तसेच पालिकेचे ‘फिटनेस प्रमाणपत्र’ मिळण्यापूर्वीच हे पर्यटनस्थळ सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आल्याचा दावा एका वरिष्ठ अधिकाऱयाने केला आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहराज्यमंत्री हर्ष संघवी रात्री मोरबीमध्ये अनेक एजन्सीद्वारे चालवल्या जात असलेल्या बचाव कार्यावर देखरेख ठेवून होते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) पाच तुकडय़ा, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) सहा तुकडय़ा, हवाई दलाची एक तुकडी, लष्कराच्या दोन तुकडय़ा आणि भारतीय नौदलाच्या दोन तुकडय़ा मदत व बचावकार्यात सहभागी झाल्या असल्याचे राज्याच्या माहिती विभागाने सांगितले. तसेच स्थानिक बचाव पथकांचा सहभाग होता.
दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्मयता आहे. अजूनही नदीपात्रात बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. रविवारी झालेल्या अपघातानंतर सोमवारी दिवसभर एनडीआरएफ, एसडीआरएफ यांच्यासह स्थानिक यंत्रणांकडून मदतकार्य सुरू होते. अपघातग्रस्त झुलता पूल गेल्या आठ महिन्यांपासून वापरात नव्हता. स्थानिक प्रशासनाने त्याच्या देखभालीची जबाबदारी खासगी कंपनीवर सोपवली होती. देखभालीचे काम पूर्ण झाल्यानंतर एजन्सीने 26 ऑक्टोबर रोजी हा पूल जनतेसाठी खुला केला, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. रविवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास पूल कोसळला, त्यामुळे नदीत पडल्याने अनेकांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत नऊ जणांना अटक
गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर पोलिसांनी पूल दुर्घटनेतील दोषींच्या अटकेची मोहीम तीव्र केली आहे. अपघातानंतर पोलिसांनी सोमवारी 9 जणांना ताब्यात घेतले होते. या सर्वांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर सर्व 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कारवाई झालेल्यांमध्ये पुलाचे व्यवस्थापक आणि देखभाल पर्यवेक्षकाचा समावेश आहे. याशिवाय पुलाच्या व्यवस्थापनाशी संबंधित सर्वांची चौकशी करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ओरेवा कंपनीचे 2 व्यवस्थापक, 2 तिकीट क्लार्क, 3 सुरक्षा रक्षक आणि 2 दुरुस्ती कंत्राटदारांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
अनेक प्रश्न उपस्थित
मोरबी पूल कोसळल्यानंतर अनेक गोष्टी समोर येत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हा पूल बंद होता. काही दिवसांपूर्वीच त्याची दुरुस्ती करण्यात आली. दुर्घटनेच्या अवघ्या 5 दिवस आधी हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला होता. अखेर हा पूल दुरुस्तीनंतर इतक्मया लवकर कसा तुटला? 100-150 लोकांची क्षमता असलेल्या या पुलावर रविवारी 400 ते 500 लोक पोहोचले, असेही सांगितले जात आहे. अखेर या पुलावर इतक्मया लोकांना कोणी येऊ दिले? या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. याप्रकरणी एसआयटीनेही तपास सुरू केला आहे.
सुट्टीचा दिवस अन् गर्दीने केला घात!
पुलावरील गर्दीमुळेच ही दुर्घटना घडल्याचा दावा केला जात आहे. पूल कोसळला तेव्हा स्थानिकांव्यतिरिक्त, आसपासच्या शहर आणि गावातील लोकही सुट्टीच्या दिवशी पुलावर आले होते. दिवाळीच्या सुट्टीमुळे आणि रविवार असल्याने पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या पुलावर पर्यटकांची गर्दी होती. दुर्घटना घडण्यापूर्वी, काही लोक पुलावर उडी मारताना आणि त्याच्या मोठय़ा तारा ओढताना दिसल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. पूल कोसळल्यावर लोक एकमेकांवर पडले. तसेच नदीत पडू नये म्हणून अनेक लोकांनी केबल्सचा आधार घेतल्याचे दृश्य व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये कैद झाले आहे. खासगी ऑपरेटरने पुलाच्या दुरुस्तीचे काम सुमारे सात महिने केले होते.
पंतप्रधान आज मोरबीला भेट देणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दुपारी स्वतः मोरबीला भेट देणार आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून सोमवारी ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे. मच्छू नदीवरील झुला पूल कोसळल्यानंतर झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मंगळवारी दुपारी मोरबीला भेट देणार असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना आणि इस्पितळांमध्ये उपचार घेणाऱयांचीही ते भेट घेणार आहेत. सध्या गुजरात दौऱयावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पटेल आणि इतर अधिकाऱयांशी चर्चा केली आहे. पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीतून मोदींनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये जाहीर केले आहेत.
राहुल गांधींनी व्यक्त केला शोक
गुजरातमधील मोरबी येथील पूल दुर्घटनेची बातमी अत्यंत दुःखद असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी सांगितले. गुजरातमधील मोरबी येथे पूल दुर्घटनेची बातमी अत्यंत दुःखद आहे. मी सर्व शोकग्रस्त कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. अपघातात जखमी झालेल्यांना सर्वतोपरी मदत करावी आणि बेपत्ता लोकांच्या शोधात सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना केले आहे.
अरविंद केजरीवाल यांचा रोड शो रद्द
आम आदमी पक्षाचे (आप) निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील मोरबी येथे पूल कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील आदमपूरमधील आपला रोड शो रद्द केला आहे. आगामी पोटनिवडणुकीत आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते सोमवारी आदमपूर येथे रोड शो करणार होते. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी गुजरातमधील मोरबी येथील पूल दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले
अमेरिका, रशिया, नेपाळकडून शोकभावना
गुजरातमधील मोरबी दुर्घटनेबद्दल भारतातील अमेरिकन दूतावासाने शोक व्यक्त केला आहे. ‘गुजरातमध्ये पूल कोसळल्याच्या बातमीने आम्हाला खूप दुःख झाले आहे. या भयंकर दुर्घटनेतील पीडित आणि कुटुंबीयांना आमच्या संवेदना’ असे ट्विट अमेरिकन दुतावासाने केले आहे. तसेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी मोरबी घटनेवर शोक व्यक्त केला आहे. नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनीही गुजरातमधील मोरबी येथे पूल कोसळण्याच्या घटनेने आपल्याला खूप दुःख झाल्याचे नमूद केले. आम्ही भारत सरकार आणि भारतातील लोकांप्रती शोक व्यक्त करतो. आमच्या संवेदना आणि प्रार्थना शोकग्रस्त कुटुंबांसोबत असल्याचे देउबा पुढे म्हणाले.