ऑनलाईन टीम / मुंबई :
शेतकरी आत्महत्या रोखण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सन 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये 47 जास्त शेतकऱयांनी आत्महत्या केल्याचे महसूल विभागाने दिलेल्या आकडेवारीवरुन समजते.
महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. विदर्भात हे प्रमाण अधिक आहे. सन 2015 मध्ये 3 हजार 228 शेतकऱयांनी आत्महत्या केल्या. 2016 मध्ये हा आकडा कमी होऊन 3052 वर आला. 2017 मध्ये झालेल्या कर्जमाफीनंतर हा आकडा 2917 होता. सन 2018 मध्ये 2761 शेतकऱयांनी आत्महत्या केली होती तर 2019 मध्ये 2808 शेतकऱयांनी आपले जीवन संपविले. त्यामधील 1286 शेतकरी विदर्भातील होते.
सन 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्याला यंदाचा राज्यातील ओला दुष्काळ आणि पश्चिम महाराष्ट्राला बसलेला महापुराचा तडाखा कारणीभूत आहे.