ऑनलाईन टीम / मुंबई :
उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद खशेखर राव यांच्या भेटीसंदर्भात उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी सोनिया गांधींची परवानगी घेतली का? असा खोचक सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला होता. त्यावरुन संतापलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांना शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिले. यावेळी राऊतांकडून पुन्हा आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली.
राऊत म्हणाले, देशात असे खूप चु## लोक आहेत. पण अशा चु## लोकांच्या बोलण्यावरून प्रश्न विचारण्यात अर्थ नाही. प्रसारमाध्यमांनी याचे भान ठेवले पाहिजे. देशात 2024 नंतर अशा चु## लोकांना स्थान उरणार नाही, ते संपतील. 2024 नंतर देशात लोकशाही येईल, राजकारण पारदर्शक असेल.
के. चंद्रशेखर राव हे त्यांच्या शिष्टमंडळासह आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला येत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी भेटायला येत असेल तर त्यांचा अशाप्रकारे अपमान करणे हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. अशा चु## लोकांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवते, असेही राऊत म्हणाले.