शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्टे प्राप्त करण्याचे ध्येय – गेलचे संचालक ई.एस.रंगनाथन यांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू दशकाच्या अंतिम कालावधीपर्यंत भारतामध्ये नैसर्गिक गॅसची विक्री वाढून मानक 55 कोटी घनमीटर प्रति दिन होणार असल्याचा अंदाज आहे. सध्याच्या कालावधीत हा 17.4 कोटी मानक घनमीटर प्रति दिन असल्याची माहिती गेल इंडियाचे विपणन संचालक ई.एस. रंगनाथन यांनी दिली आहे.
गॅसची विक्री वाढण्यामागे विविध घडामोडी कारणीभूत ठरणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्टील सारख्या नवीन उद्योगांमध्ये याचा वापर वाढत असल्याच्या कारणास्तव गॅसची वाढ ही वाढती राहणार असल्याचे संकेत आहेत.
2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय घेऊन भारत प्रवास करणार असून अन्य बाबतीत गॅसची भूमिका महत्वाची ठरणार आहे. एक स्वच्छ आणि कमी उत्सर्जन असणारी व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न असणार असल्याचेही गेलचे संचालक रंगनाथन यांनी स्पष्ट केले आहे.
ऊर्जेची गरज लक्षात घेणे आवश्यक
आमच्या जवळ प्राथमिक ऊर्जेचा वापर करताना कोळशासह अन्य घटकांचा वापर केला जातो. परंतु भारताचे ध्येय हे ब्लू हायड्रोजन आणि अमोनिया यासारख्या उत्पादनांसह शून्य उत्सर्जनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.