नुकसानभरपाईचा पत्ताच नाही
प्रतिनिधी /बेळगाव
22 जनावरे दगावल्याने मागील काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली असलेल्या जनावरांच्या मालकाचे रविवारी निधन झाले. त्यामुळे गवळी बांधवातून हळहळ व्यक्त होत आहे. एप्रिल महिन्यापासून टप्प्याटप्प्याने तब्बल 22 जनावरे अज्ञात आजाराने मरण पावली. त्यामुळे या कुटुंबीयाचा गोठाच रिकामा झाला. त्यामुळे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न कुटुंबीयांसमोर होता. याच तणावाखाली पिराजी रामजी चौधरी (वय 70) रा. मंगळवार पेठ, टिळकवाडी यांचे निधन झाले.
गवळी कुटुंबीयांची तब्बल 22 दुभती जनावरे अज्ञात रोगाने दगावल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान, पशुसंगोपन खात्याच्या वरि÷ अधिकाऱयांनी गोठय़ाला भेट दिली होती. मात्र, अद्याप कुटुंबीयांना कोणतीही भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे कुटुंबीय अडचणीत आले होते. जातीवंत जनावरांचा डोळय़ांसमोरच मृत्यू झाल्याने पिराजी गवळी यांना धक्का बसला होता. ते मागील काही दिवसांपासून तणावाखाली वावरत होते. अखेर रविवारी त्यांचे निधन झाले.
बाजारात साधारण एका दुभत्या जनावराची किंमत 70 ते 80 हजार रुपये आहे. या गवळी कुटुंबीयांच्या तब्बल 22 दुभत्या म्हशी दगावल्या आहेत. त्यामुळे कुटुंबीयांना आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. एप्रिल महिन्याच्या दरम्यान पशुवैद्यकीय अधिकाऱयांनी मरण पावलेल्या जनावरांचा पंचनामा केला होता. मात्र, रोगाचे निदान झाले नव्हते. दरम्यान, निधन झालेल्या जनावरांच्या भरपाईसाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, हे गवळी कुटुंबीय अद्याप शासनाच्या भरपाईपासून वंचित आहे. त्यामुळे कुटुंबातील इतर व्यक्तीदेखील तणावाखाली वावरताना दिसत आहेत.