जिल्हा पोलिसांची कारवाई : 8 कोटी 58 लाखांचा मुद्देमाल जप्त, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या 22 महिन्यांमध्ये 206 वेगवेगळय़ा गुन्हेगारी प्रकरणांचा छडा लावून जिल्हा पोलिसांनी 8 कोटी 58 लाख 23 हजार 999 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी सोमवारी ही माहिती दिली. पोलीस परेड मैदानावर जप्त मुद्देमाल संबंधितांना परत करण्याच्या प्रक्रियेला चालना देण्यात आली.
यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्यासह जिल्हय़ातील अनेक अधिकारी उपस्थित होते. सोमवारी पोलीस परेड मैदानावर जिल्हय़ातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांना चोरी प्रकरणात जप्त केलेला मुद्देमाल परत करण्यात आला. जप्त मुद्देमालांनी परेड मैदान भरला होता. जिल्हय़ातील वेगवेगळय़ा पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातून नागरिक मुद्देमाल परत मिळविण्यासाठी मैदानावर उपस्थित होते.
चालू वषी 30 टक्के गुन्हय़ांचा तपास
जिल्हा पोलीस प्रमुख व इतर अधिकाऱयांनी सुरूवातीला पोलीस स्थानक निहाय जप्त मुद्देमालांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण निंबरगी म्हणाले, 1 जानेवारी 2020 पासून 31 ऑक्टोबर 2021 या काळात एकूण 206 वेगवेगळय़ा गुन्हेगारी प्रकरणांचा छडा लावण्यात आला आहे. 2020 मध्ये 58 टक्के तर चालू वषी 30 टक्के गुन्हय़ांचा तपास झाला आहे.
अथणी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील इम्तियाज बिरादार, ऐगळी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील रामचंद्र, कागवाड पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील दुष्यंत कांबळे, रायबाग पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील आदगौडा पाटील, कुडची पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील रामाप्पा बाणे, हारुगेरी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील संतोष शिंगाडी, चिकोडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील रमेश शिंदे आदींसह प्रत्येक पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातून आलेल्या प्रत्येकी एकाला सांकेतिकरित्या मुद्देमाल परत करण्यात आला.
2020 मध्ये 2 किलो 336 ग्रॅम तर चालू वषी 702.24 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. 2020 मध्ये 17 किलो 881 ग्रॅम व चालू वषी 1 किलो 275 ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली आहे. 2020 मध्ये चोरी प्रकरणातील 72 व चालू वषी 96 मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. गेल्या वषी 10 तर चालू वषी 22 चारचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. 2020 मध्ये 16 तर चालू वषी 32 मोबाईल जप्त करण्यात आल्याचे पोलीस प्रमुखांनी सांगितले.
गेल्या 22 महिन्यात वेगवेगळय़ा प्रकरणात 10 लाख 6 हजार 850 रुपये रोकड जप्त करण्यात आली असून सीईएन पोलिसांनीही सायबर गुन्हेगारी प्रकरणांचा छडा लावून 2020 मध्ये 36 लाख 93 हजार 701 रुपये व चालू वषी 49 लाख 73 हजार 298 रुपये रोकड जप्त केली आहे. गुन्हेगारी प्रकरणांचा छडा लावण्यासाठी प्रयत्न केलेल्या अधिकारी व पोलिसांना प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात येईल, असे पोलीस प्रमुखांनी सांगितले. न्यायालयाची परवानगी घेऊन मुद्देमाल परत करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. दोन दिवसांत पोलीस स्थानक निहाय मुद्देमाल संबंधितांना परत करण्यात येणार आहे.
काही ठळक प्रकरणे
गेल्या 22 महिन्यात जिल्हा पोलिसांनी तपास केलेल्या काही ठळक प्रकरणांचा पोलिस प्रमुखांनी आढावा घेतला. कागवाड पोलिसांनी 16 जून 2020 रोजी पाच संशयितांना अटक केली होती. अभयसिंह गायकवाड (रा. हुपरी, जि. कोल्हापूर, सध्या रा. बेळगाव) अशोक खिलारी (रा. सॅनेडी, जि. सातारा, सध्या रा. बेळगाव), अक्षक देसाई (रा. अर्जुनी, ता. कागल, सध्या रा. बेळगाव) आदींचा यामध्ये समावेश आहे. त्यांच्याजवळून 1 कोटी 8 लाख 54 हजार 150 रुपये जप्त करण्यात आल्याचे पोलीस प्रमुखांनी सांगितले. चिकोडी पोलिसांनी दरोडे प्रकरणांचा छडा लावून 12 जून 2020 रोजी गुरूनाथ हळ्ळळी (रा. इटनाळ), खलीम मालदार (रा. चिंचली), दादासाब टोणी (रा. संबरगी), जनार्धन गेत (रा. पिंपळवाडी), दिनेश कोळ्ळी (रा. संबरगी), शिवानंद पणदी (रा. मुगळखोड), पांडुरंग मालद्दिनी (रा. घटप्रभा), सचिन चौगला (रा. नागनूर पी.ए.), यल्लालिंग हळ्ळळी (रा. इटनाळ) यांच्या जवळून 20 लाख रुपये किमतीचा चोरीचा ट्रक व 13 लाख रुपये किमतीची हळद जप्त करण्यात आली होती. अथणी, कुडची, गोकाक शहर, अंकली, मुरगोड, चिकोडी, घटप्रभा आदी वेगवेगळय़ा पोलीस स्थानकात नोंद झालेल्या चोऱया, घरफोडय़ा, दरोडे, खून प्रकरणांचा छडा लावण्यात आल्याचे पोलीस प्रमुखांनी सांगितले.
गुन्हेगारी थोपविण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मोलाचे : जिल्हा पोलीस प्रमुखांची माहिती
एखादा गुन्हा घडल्यानंतर संबंधितांना मदत करण्यासाठी, गुन्हय़ाचा छडा लावण्यासाठी पोलीस दल तत्पर असते. मात्र गुन्हे घडू नयेत यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज असून गुन्हेगारी थोपविण्यात नागरिकांचे सहकार्य मोलाचे असते, असे जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितले. सोमवारी पोलीस परेड मैदानावर जप्त मुद्देमाल संबंधितांना परत करण्याच्या प्रक्रियेला चालना देण्यात आली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना पोलीस प्रमुखांनी संपूर्ण गुन्हेगारी प्रकरणांचा आढावा घेतला. चोऱया, घरफोडय़ा थोपविण्यासाठी नागरिकांनीही आपली जबाबदारी कशी पार पाडावी, यासंबंधी माहिती दिली.
आस्थापने व घरांवर सीसीटीव्हीचे कॅमेरे बसवावेत, त्यामुळे गुन्हेगारीत मोठय़ा प्रमाणात घट होते. कॅमेरे बसविल्यानंतरही जर एखादा गुन्हा घडला तर पोलिसांना फुटेजच्या आधारावर गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे शक्मय होते. त्यामुळे नागरिकांनी खास करुन ज्यांना शक्मय आहे त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन पोलीस प्रमुखांनी केले. एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याचा तपास करुन संबंधितांना मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. मात्र गुन्हाच घडू नये यासाठी प्रत्येकांनी काळजी घेण्याची गरज आहे. सोने, नाणे व किंमती वस्तू घरी ठेवू नये. खास करुन परगावी जाताना या वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवून जावेत. शेजाऱयांना किंवा जवळच्या पोलीस स्थानकाला या संबंधीची कल्पना देवून जावे, आपल्या गावात संशयितांचा वापर दिसून आल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही पोलीस प्रमुखांनी केले.
प्रत्येकांनी आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली व योग्य ती खबरदारी घेतली तर भरपूर गुन्हे रोखता येणार आहेत. गेल्या जवळपास दोन वर्षांत जिल्हय़ात पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात गुन्हेगारांच्या मुसक्मया आवळून मुद्देमाल जप्त केले आहेत. ही प्रक्रिया सुरूच ठेवण्यात येणार आहे. या प्रक्रियेत नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. नागरिकांकडून येणाऱया प्रत्येक माहितीची पोलीस दलाला तपास कामात मदत होणार आहे, असे त्यांनी सांगितले.