ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यातील माता-भगिनी, युवती-विद्यार्थींना शुभेच्छा देऊन अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडण्यासाठी सुरुवात केली. महाराष्ट्राच्या अर्थकारणात महिलांचा विशेष सहभाग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
- आरोग्य विभागासाठी आरोग्यासाठी 7 हजार 500 कोटींची तरतूद
पुढे ते म्हणाले, जिल्हा रुग्णालये, मनो रुग्णालये उभारली जाणार आहेत. यासोबतच आरोग्य व्यवस्थेत सुधारणा केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी संगतले. या राज्यातील ज्या रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना नसलेल्या रुग्णालयात ही व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
पवार म्हणाले, कृषी क्षेत्रानेच यंदा अर्थव्यवस्थेला सावरले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, 31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना 19 हजार कोटी थेट वर्ग केले असून शेतकऱ्यांना सुलभरित्या कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. आतापर्यंत 42 हजार कोटींचे यंदा पीक कर्ज वाटण्यात आले आहे.
- शेतकऱ्यांसाठी शून्य व्याज दराने कर्ज
तर 3 लाख रुपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने दिले आहे. यासोबतच राज्यात कृशिपंप धोरण अवलंबिले जाणार आहे. कृषी पंप जोडणीसाठी महावितरणला 1500 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. विकेल ते पिकेल या धोरणाद्वारे 2100 कोटींची खरेदीसंत्रा उत्पादकांसाठी नाशिक जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योग उभारणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.