अतिवृष्टीमुळे अनेक जिल्हय़ात सतर्कतेचा इशारा
कोची / वृत्तसंस्था
केरळच्या डोंगराळ भागात गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. भारतीय हवामान खात्याने मंगळवारसाठी कासारगोड वगळता सर्व जिह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’चा अंदाज वर्तवला आहे. याचदरम्यान केरळमधील थोडुपुझा येथे मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना इडुक्की जिह्यातील तोडूपुझाजवळील कंजार गावात सोमवारी दुपारी 2.30 च्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंजर येथील रहिवासी थंकम्मा (80), त्यांचा मुलगा सोमण (52), पत्नी शाजी (50), मुलगी शिमा (30) आणि देवानंद (पाच) यांचा सकाळी दरडीखाली दबल्याने मृत्यू झाला. राज्यात अन्य काही ठिकाणीही दमदार पाऊस सुरू आहे. कोट्टायम जिह्यातील नेदुनकुन्नम, करुकाचल गावांमध्ये पुरामुळे स्थानिक रहिवाशांना वाचवण्यासाठी अग्निशमन दल पाठवण्यात आले आहे.
केरळमधील पथनमथिट्टा जिह्यातील मल्लाप्पल्ली तालुक्मयाच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मल्लापल्ली, अनिकड आणि थोलियुर या गावांमध्ये छोटय़ा नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. मल्लाप्पल्ली तालुक्मयातील कोट्टंगल गावात काही घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. पुराच्या पाण्यात वाहत असलेल्या एका कारला स्थानिक नागरिकांनी मदतकार्य करून वाहण्यापासून वाचवल्यामुळे चौघांना जीवदान मिळाले.
राज्यात मलप्पुरम, कोझिकोड आणि कन्नूर जिह्यातील डोंगराळ भागात गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. मात्र, आतापर्यंत कुठलीही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही. मलप्पुरम जिह्यातील अलप्पुझा नदीच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे अधिकाऱयांना काठावर राहणाऱया लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.