आतापर्यंत 34 एसटी कर्मचाऱयांचे निलंबन : संप सुरूच
प्रतिनिधी / कणकवली:
शासनाने पगारवाढ जाहीर केली असली, तरीही शासनात विलिनीकरणासाठी एसटी कर्मचाऱयांचे कामबंद आंदोलन सुरूच आहे. दरम्यान, याप्रकरणी सिंधुदुर्ग विभागातील 34 कर्मचाऱयांना आतापर्यंत निलंबित करण्यात आले असून 51 कर्मचाऱयांची सेवा समाप्ती करण्यात आल्याची माहिती एसटीच्या सूत्रांकडून देण्यात आली.
एसटी कर्मचाऱयांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन सिंधुदुर्गमध्ये सलग 18 व्या दिवशी सुरू आहे. त्यामुळे शाळकरी मुले, सर्वसामान्यांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने 41 टक्के पगारवाढ जाहीर केली, तरीही शासन सेवेत विलिनीकरणासाठी कामगार मागणीवर ठाम राहिले आहेत. त्यामुळे गुरुवारीही जिल्हय़ातून एकही एसटी बस धावू शकली नव्हती. सिंधुदुर्ग विभागात आतापर्यंत 159 कर्मचारी कामावर हजर झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, सिंधुदुर्ग विभागातील आतापर्यंत 34 कर्मचाऱयांचे निलंबन करण्यात आले आहे. 24 तासांत कामावर हजर होण्यासंदर्भात 152 रोजंदारीवरील कर्मचाऱयांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यापैकी 51 कर्मचाऱयांची सेवा समाप्ती करण्यात आली असल्याचेही सूत्रांनी सांगितले.